ठाणे

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण ओव्हरफ्लो

भिवंडी - निजामपूर या महापालिकांसह औद्योगिक विभाग व अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील काही भागाला पाणीपुरवठा केला जातो

प्रतिनिधी

ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण अखेर भरून वाहू लागते आहे. गुरुवारी संध्याकाळी बारवी धरण ३४० दशलक्ष घनमीटर पाणी पातळी गाठून वाहू लागले आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्याची पाण्याची चिंता मिटणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, कल्याण - डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी - निजामपूर या महापालिकांसह औद्योगिक विभाग व अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका क्षेत्रातील काही भागाला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे बारवी धरण जिल्ह्यासाठी महत्वाचा जलस्त्रोत आहे. दरवर्षी साधारणतः जुलै महिन्यात बारवी धरण ओव्हरफ्लो होत असते. मागील वर्षीही जुलै अखेरीस बारवी धरण ओव्हरफ्लो झाले होते. परंतु यंदा मे महिन्याच्या अखेरीस बारवी धरणाची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात खालावली होती. त्यात यंदा जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने चिंता वाढली होती. जुलै महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात पावसाचा मात्र जोर वाढला.

दोन भारतीय LPG जहाजे होर्मुझमधून भारताकडे रवाना

देशभरात सिलिंडर तुटवडा; पंजाबच्या रांगेत गेला एकाचा जीव; यूपीत रात्रीपासून रांगा, एमपीमध्ये पळापळ, २ हजारांचा सिलिंडर ४ हजारांना

LPG ला पर्याय DME सापडला; पुण्यातील शास्त्रज्ञांना यश; 'नॅशनल केमिकल लॅबोरेटरीज'च्या २० वर्षांचे संशोधन फळाला

खर्ग बेटावर अमेरिकेचा हल्ला; इराणचे सर्व लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याचा ट्रम्प यांचा दावा

"आय लव्ह इंडिया, लव्ह मोदी..."; डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासाठी संदेश दिल्याचा लॉरा लूमर यांचा दावा