ठाणे

मुसळधार पावसात रिक्षाचालकांची लूट, परिवहन उपक्रमाकडून वेळेवर बस सेवा

केडीएमटी कडून कल्याणच्या दिशेने व दावडी, मिलापनगर बस सोडल्या

शंकर जाधव

डोंबिवली

मुसळधार पावसामुळे काही वेळ रेल्वे सेवा ठप्प झाली होती. प्रवासी वर्गाने घरी पोहोचण्यासाठी रिक्षाने प्रवास करणे पसंत केले मात्र वाहतूक कोंडीचे कारण पुढे करत नेहमीप्रमाणे रिक्षाने लूट सुरू केली होती. तर काही रिक्षाचालकांनी जवळील भाडे नाकारल्याने नागरिक संतप्त झाले होते. तर केडीएमटी कडून कल्याणच्या दिशेने पाच, दावडी व मिलापनगर बस सोडल्या होत्या. मात्र इतर दिवसांपेक्षा जास्त प्रवासी वर्ग असल्याने बसेसमध्ये गर्दी झाली होती. तर बसची प्रतिक्षा करताना प्रवासी वर्गाची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र काही प्रवासी परिवहन उपक्रम व रिक्षाचालकांवर नाराज झाले होते. 

Maharashtra Rain : महाराष्ट्राला पावसाचा तडाखा; ८३ लाख एकरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान

मराठवाडा पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची मदत; पारलिंगी समुदायाने मागितला जोगवा, राज्यातील शिक्षकांचाही पुढाकार

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्ततेनंतर लष्करात पुन्हा स्थान; प्रसाद पुरोहित यांची कर्नल पदी बढती

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून