ठाणे

मुसळधार पावसात रिक्षाचालकांची लूट, परिवहन उपक्रमाकडून वेळेवर बस सेवा

केडीएमटी कडून कल्याणच्या दिशेने व दावडी, मिलापनगर बस सोडल्या

शंकर जाधव

डोंबिवली

मुसळधार पावसामुळे काही वेळ रेल्वे सेवा ठप्प झाली होती. प्रवासी वर्गाने घरी पोहोचण्यासाठी रिक्षाने प्रवास करणे पसंत केले मात्र वाहतूक कोंडीचे कारण पुढे करत नेहमीप्रमाणे रिक्षाने लूट सुरू केली होती. तर काही रिक्षाचालकांनी जवळील भाडे नाकारल्याने नागरिक संतप्त झाले होते. तर केडीएमटी कडून कल्याणच्या दिशेने पाच, दावडी व मिलापनगर बस सोडल्या होत्या. मात्र इतर दिवसांपेक्षा जास्त प्रवासी वर्ग असल्याने बसेसमध्ये गर्दी झाली होती. तर बसची प्रतिक्षा करताना प्रवासी वर्गाची लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र काही प्रवासी परिवहन उपक्रम व रिक्षाचालकांवर नाराज झाले होते. 

विधिमंडळाचे उद्यापासून पावसाळी अधिवेशन; ऑपरेशन टायगर, पाणीटंचाई, शेतकरी कर्जमाफी, विषारी दारूकांडाचे मुद्दे गाजणार

शिंदेंच्या नेतृत्वाखालील एकच शिवसेना अस्तित्वात; 'व्होट बँक 'वरून अमित शहांचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा

प्रवाशांचे हाल सुरूच; 'मेस्मा' अंतर्गत नोटीस जारी, बेस्ट कर्मचारी संपावर ठाम, 'नीट'च्या पार्श्वभूमीवर मध्यस्थी करण्याची मागणी

विनातिकीट प्रवास; किमान ५०० रुपये दंड, रेल्वेकडून नवीन नियमांची अंमलबजावणी सुरु

टॅक्सी, रिक्षा परवान्यांच्या कागदपत्रांची राज्यव्यापी पडताळणी सुरू; राज्य सरकारचा निर्णय