Thane : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार; हॉटेल व्यावसायिकांची कारवाईची मागणी ANI
ठाणे

Thane : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार; हॉटेल व्यावसायिकांची कारवाईची मागणी

मध्यपूर्व प्रदेशात सुरू असलेल्या तणावाचे चटके आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागले असून त्याचा फटका ठाण्यातील हॉटेल व्यवसायाला बसत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्याने बाजारातून सिलिंडर गायब होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या टंचाईचा गैरफायदा घेत काहीजण व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करत असल्याचा आरोप ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनी केला आहे.

Swapnil S

ठाणे : मध्यपूर्व प्रदेशात सुरू असलेल्या तणावाचे चटके आता स्थानिक पातळीवरही जाणवू लागले असून त्याचा फटका ठाण्यातील हॉटेल व्यवसायाला बसत आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाल्याने बाजारातून सिलिंडर गायब होत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या टंचाईचा गैरफायदा घेत काहीजण व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करत असल्याचा आरोप ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनी केला आहे. सुमारे १,८०० रुपयांना मिळणारा व्यावसायिक गॅस सिलिंडर काळ्या बाजारात ४ ते ५ हजार रुपयांना विकला जात असल्याचा दावा ठाणे हॉटेल असोसिएशनने केला आहे.

यासंदर्भात ठाणे हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारने तातडीने हस्तक्षेप करून काळ्या बाजारावर नियंत्रण आणावे, अशी मागणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सध्या एका महिन्याचा गॅस साठा उपलब्ध असल्याचे सांगितले असले, तरी काळ्या बाजारात मोठ्या प्रमाणात गॅस विक्री होत राहिल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, अशी भीती संघटनेने व्यक्त केली. ठाणे शहरातील सुमारे ३० टक्के हॉटेल्सना पाइपलाईन गॅसची सुविधा उपलब्ध असून उर्वरित ७० टक्के हॉटेल व्यवसायिक व्यावसायिक गॅस सिलिंडरवर अवलंबून आहेत. अन्यथा परिस्थिती अशीच राहिल्यास येत्या काही दिवसांत ठाण्यातील अनेक हॉटेल्स बंद पडण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला.या पत्रकार परिषदेला ठाणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष उमेश शेट्टी, उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी, सचिव रघुनाथ रॉय, खजिनदार प्रशांत शेट्टी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.या पत्रकार परिषदेला ठाणे हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष उमेश शेट्टी, उपाध्यक्ष रत्नाकर शेट्टी, सचिव रघुनाथ रॉय, खजिनदार प्रशांत शेट्टी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

खाद्य व्यावसायिकांना फटका

अखत्यारीतील युद्धस्थिती कायम राहिल्यास ठाणे-मुंबई परिसरात येणारे पर्यटक, व्यावसायिक, आयटी कर्मचारी तसेच कामगार यांनाही अन्नपुरवठ्याबाबत अडचणी निर्माण होऊ शकतात. ठाणे शहरात सुमारे १,२०० हॉटेल्स कार्यरत असून लहान-मोठ्या खाद्य व्यावसायिकांची संख्या पाच हजारांपेक्षा जास्त आहे. गॅस टंचाई वाढल्यास वडापावसारख्या छोट्या खाद्यपदार्थांच्या टपऱ्यांनाही फटका बसण्याची शक्यता असल्याचेही संघटनेने सांगितले.

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Navi Mumbai : एलपीजी टंचाईमुळे सानपाडा गॅस एजन्सीसमोर नागरिकांची झुंबड; सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा; Video

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती