(प्रातिनिधिक फोटो) 
ठाणे

उल्हासनगरच्या बालसुधारगृहातून सहा मुलींचे पलायन; दोघींना शोधण्यात यश

उल्हासनगरातील महिला बालसुधारगृहातून थरारक पळ काढणाऱ्या सहा मुलींमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगरातील महिला बालसुधारगृहातून थरारक पळ काढणाऱ्या सहा मुलींमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या तातडीच्या शोधमोहिमेत दोन मुलींचा शोध लागताच या प्रकरणाला नवी कलाटणी मिळाली असून उर्वरित चौघींचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा कसून प्रयत्न करत आहे.

उल्हासनगरात तहसीलदार कार्यालयाच्या शेजारी असलेल्या महिला बालसुधारगृहातून तब्बल सहा मुली पळाल्याची घटना समोर आली आहे. कॅम्प क्रमांक ५ मधील या बालसुधारगृहात अनाथ, भिक्षेकरी तसेच गरज असलेल्या मुलींना आश्रय दिला जातो. त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था येथे केली जाते. मात्र गुरुवारी या सहा मुलींनी संधी साधून पळ काढला. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या नेतृत्वाखालील टीमने दोन मुलींना शोधण्यात यश मिळवले. या दोघींनी चौकशीत 'आम्हाला येथे राहायचे नव्हते म्हणून पळालो,' असे सांगितल्याचे समजते.

या संपूर्ण कारवाईची माहिती देताना परिमंडळ-४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी घटनेची पुष्टी केली. तर सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरित चार मुलींचा कसून शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी सांगितले.

मध्य रेल्वे २०१२ उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवणार; अतिरिक्त १२० विशेष गाड्या चालविण्याचे नियोजन

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरीचा राजा’ शहरात दाखल; हापूसच्या आगमनाने बाजारात सुगंध, दर मात्र दुपटीने वाढले

मुंबईचा पाणीप्रश्न सभागृहात पेटला; शहरात टँकर लॉबी सक्रिय, सत्ताधारी पक्षांसह विरोधकांचा आरोप

अमली पदार्थाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण; सहभागी गुन्हेगारांची संपत्तीही होणार जप्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती