प्रातिनिधिक छायाचित्र
ठाणे

जावयाने केला सासू-सासरे आणि मेहुण्यावर हल्ला

उल्हासनगर कॅम्प न ४ भागातील भरत नगर परिसरात जावयाने सासू-सासरे आणि मेहुण्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प न ४ भागातील भरत नगर परिसरात जावयाने सासू-सासरे आणि मेहुण्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रेखा गावडे, चिदानंद गावडे आणि रोहित गावडे हा हल्ल्यात यामध्ये जखमी झाले आहेत. तर समाधान बाविस्कर असे हल्ला करणाऱ्या जावयाचे नाव आहे. समाधानचे २० मे रोजी चिदानंद गावडे यांच्या मुलीशी लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर काही दिवसातच पती-पत्नीमध्ये छोट्या छोट्या कारणांमुळे वादविवाद सुरू झाले होते. सततच्या वादामुळे चिदानंद यांची मुलगी कायमची माहेरी आली. यावेळी तिने आपल्यासोबत स्वत: खरेदी केलेल्या संसार उपयोगी वस्तू देखील आणल्या होत्या. याच वस्तू मागण्यासाठी समाधान आपल्यासोबत पाच ते सहा जणांना घेऊन गावडे यांच्या घरी गेला होता.

यावेळी गावडे यांनी विरोध केल्यानंतर समाधान व सोबत आलेल्या पाच ते सहा जणांनी लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी रेखा गावडे, चिदानंद गावडे आणि रोहित गावडेवर जीवघेणा हल्ला केला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"...तर महिलांना कोणी नोकरी देणार नाही"; मासिक पाळी रजेची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Maharashtra Weather : हवामान खात्याचा अंदाज; राज्यात चार दिवस वादळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Mumbai : पालिका शाळाही ‘गॅस’वर; मध्यान्ह भोजनात आता विद्यार्थ्यांना फळ वाटप, रुग्णालयांत सिलिंडर पुरवठा करण्यासाठी गॅस कंपनीला पत्र

अजित पवारांच्या अपघातातील सत्य सांगा! राष्ट्रवादीच्या सुनील शेळके यांची मागणी

ST डेपोच्या विकासासाठी भाडेकराराला ९८ वर्षांपर्यंत वाढ; सरकारकडे प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी दाखल