
मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने बँका आणि मुदतठेवी घेणाऱ्या नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांना सध्याच्या आणि नवीन ग्राहकांकडून सर्व ठेव खाती, सुरक्षित राहण्यासाठी आणि सेफ्टी लॉकर्ससाठी काटेकोरपणे ग्राहकांकडून नामांकन प्राप्त करून घेण्यास सांगितले आहे. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी एका प्रसिद्धीपत्रकात वरील सूचना केली.
अनेक मुदतठेवी खात्यांसाठी नामांकन उपलब्ध नव्हते आणि म्हणून, जिवंत असलेल्या किंवा मृत ठेवीदारांच्या कुटुंबातील सदस्यांना होणारी गैरसोय आणि अवाजवी त्रास टाळण्याचे निरीक्षण नोंदवत रिझर्व्ह बँकेने नामांकन आवश्यकतेचा पुनरुच्चार केला.
नियामकाने असेही म्हटले आहे की, बँकांनी संवेदनशील होऊन नामांकन मिळविण्यासाठी तसेच मृत व्यक्तींचे दावे हाताळण्यासाठी आणि नामनिर्देशित किंवा कायदेशीर वारसांशी व्यवहार करण्यासाठी शाखांमधील त्यांच्या ‘फ्रंटलाइन’ कर्मचाऱ्यांकडून हे काम करुन घेतले पाहिजे. बँकेने नामांकनाच्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेतला पाहिजे आणि ३१ मार्चपासून त्रैमासिक आधारावर रिझर्व्ह बँकेला अहवाल द्यावा.
आरबीआयने म्हटले आहे की, ठेवीदारांना नामांकनाचा लाभ घेण्याचा किंवा निवड रद्द करण्याचा पर्याय देऊन बँका मुदतठेवी खाती उघडण्यासाठी त्यांच्या अर्जामध्ये बदल करू शकतात.