

अमळनेर : अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे एकाच कुटुंबातील पती-पत्नीसह दोन लहान मुलांनी धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.२७) पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून, टाकरखेडा गावावर शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुनील अमृत भिल, त्यांची पत्नी पार्वती सुनील भिल तसेच त्यांचा दुसरीत शिकणारा मुलगा सनी आणि अंगणवाडीत जाणारा राज हे चौघे पहाटे चारच्या सुमारास घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी धावत्या रेल्वेखाली झोकून देत जीवन संपवले. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याची चर्चा असली तरी पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.