

नवी दिल्ली : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि 'कॉकरोच जनता पार्टी' (सीजेपी) यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. सीजेपीने आपल्या राजीनाम्याची मागणी करत देशभर आंदोलन पुकारले असतानाच, धर्मेंद्र प्रधान यांनी या आंदोलकांवर अत्यंत बोचरी टीका करताना सीजेपी दहशतवाद्यांची बी टीम आहे असे म्हटले आहे.
प्रधान म्हणाले की, जे लोक लोकशाहीत जनतेकडून नाकारले गेले आहेत, तेच लोक आज विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण करून परीक्षा प्रक्रियेत अडथळे आणण्याचा प्रयत्न करत आहेत.सीजेपीचे आंदोलन काय आहे,'कॉक्रोच जनता पार्टी' या संघटनेने गेल्या १५ दिवसांपासून दिल्लीतील जंतरमंतरसह देशातील ८ प्रमुख शहरांमध्ये सातत्याने निदर्शने केली आहेत. नीट परीक्षेतील अनियमितता आणि पेपरफुटीच्या निषेधार्थ हे आंदोलन सुरू असून, पक्षाने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही सहभाग नोंदवला असून, प्रधान यांनी राजीनामा न दिल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. प्रधानविरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना प्रधान यांनी २१ जून रोजी पार पडलेली नीट पुनर्परीक्षा पूर्णपणे यशस्वी झाल्याचा दावा केला. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण करण्याचे विरोधकांचे प्रयत्न सपशेल अपयशी ठरल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.