आदित्य ठाकरेंचा शिंदे गटातील आमदारांना खोचक टोला ; म्हणाले, "जे ओरिजन गद्दार आहेत त्यांचं..."

शिंदे गटातील मंत्रिपदाची आस धरुन बसलेल्या आमदारांना मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा
आदित्य ठाकरेंचा शिंदे गटातील आमदारांना खोचक टोला ; म्हणाले, "जे ओरिजन गद्दार आहेत त्यांचं..."

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे सरकाशी केलेल्या हातमिळवणी केली. तसंच राष्ट्रवादीच्या आठ नेत्यांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या झालेल्या विस्तारात राष्ट्रवादीच्या आमदारांना स्थान मिळालं पण शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपच्या आमदारांना स्थान मिळालं नाही. तसंच अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करुन उद्धव ठाकरे यांच्यावरिधात बंड केलेल्या शिंदे गटावर आदित्य ठाकरे यांनी खोचक शब्दात टीका केली आहे.

स्वार्थी विरुद्ध प्रामाणिक असं राजकारण सध्या राज्यात सुरु असून राजकारण गलिच्छ होत चाललं आहे. ही सर्कस कधी थांबणार असा प्रश्न सध्या सर्वांना पडत आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. शिंदे गटातील मंत्रिपदाची आस धरुन बसलेल्या आमदारांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या धुसफुस सुरु अल्याच्या देखील चर्चा आहे. त्यात आमदार संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी उघडपणे आमदारांच्या नाराजीवर भाष्य केलं आहे.

शिंदे गटाच्या आमदारांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न दिल्याने ठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे या आमदारांना डिवचण्याच काम केलं आहे. शिंदे गटाच्या आमदारांवर बोलताना ते म्हणाले की, "मला हसू यावर येतंय की, वर्षभरापूर्वुी ज्यांनी गद्दारी केली त्यांना आज भाजपने काय किंमत दिली ते आम्ही पाहिलं. मंत्री, कॅबिनेट मंत्री बणण्याच्या आशेवर सोडून गेले. मागच्या शपथविधीला चार दिवस झाले असून त्यांना कुठलाही कॅबिनेटचा पोर्टफोलिओ कुठला ते दिला नाही. पण जे ओरिजन गद्दार आहेत त्यांचं मला हसू येतंय. त्यांची खरी किंमत काय ते ज्यांनी त्यांना फोडलं त्यांनीच दाखवून दिली आहे." असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना लगावला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in