सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर जहरी टीका; म्हणाले, "हा सैतान गाव..."

शरद पवारांवर नियतीने मोठा सूड उगवला असल्याचंही ते म्हणाले
सदाभाऊ खोत यांची शरद पवारांवर जहरी टीका; म्हणाले, "हा सैतान गाव..."

रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टीका केली आहे. मात्र यावेळी खोत यांची जीभ घसरी आहे. शरद पवार यांच्यावर टीका करताना खोत यांनी त्यांचा 'सैतान' असा उल्लेख केला आहे. नुकतीचं राष्ट्रवादीत झालेल्या बंडाळीवर बोलताना खोत यांनी टीका केली आहे.

पूर्वी बापाने केलेलं मुलाला फेडावं लागत होतं. पण कलयुगात जो पाप करतो त्यालाचं फेडावं लागतं. शरद पवार यांनाचा हे पाप फेडावं लागणार आहे. अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. यावेळी बोलताना हा सैतान गावगाड्यापर्यंत येता कामा नये, असा घणाघात त्यांनी शरद पवारांवर केला.

महाराष्ट्रातील राजकारणात यशवंतराव चव्हाण, सुधारराव नाईक, वसंतदादा पाटील यांचं मोठ योगदान आहे. सध्या मराराष्ट्रातील राजकारण हे प्रस्थापितांकडून विस्थापिकांकडे जात आहे, असं देखील ते म्हणाले. शरद पवार यांच्या कालखंडात राजकारणात वाडे विरुद्ध गावगाडे, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित असा संघर्ष उभा राहिला. त्यांनी सरदारांना बरोबर ठेवून राज्य केलं. त्या सरदारांनी शेतकऱ्यांची घरे लुटली. गावगाडा उधवस्थ केला. ते सरदार आता सैरा वैरा पळत आहेत. शरद पवारांवर नियतीने मोठा सूड उगवला असून त्यांना गावगाड्याकडे धावत यावं लागत आहे, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in