IPL च्या अंतिम सामन्यासाठी पुन्हा अहमदाबादलाच पसंती; गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार फायनल

आयपीएलच्या १९व्या हंगामाचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. बीसीसीआयने पुन्हा एकदा अहमदाबादलाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादला होईल.
IPL च्या अंतिम सामन्यासाठी पुन्हा अहमदाबादलाच पसंती; गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार फायनल
IPL च्या अंतिम सामन्यासाठी पुन्हा अहमदाबादलाच पसंती; गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार फायनल
Published on

मुंबई : आयपीएलच्या १९व्या हंगामाचा अंतिम सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. बीसीसीआयने पुन्हा एकदा अहमदाबादलाच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत चौथ्यांदा आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादला होईल.

२०२२, २०२३, २०२५ या वर्षी अहमदाबादला आयपीएलचा अंतिम सामना झाला होता. २०२४मध्ये कोलकाताने जेतेपद मिळवल्यावर २०२५चा अंतिम सामना ईडन गार्डन्सला होणे अपेक्षित होते. मात्र पहलगाम हल्ल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव अहमदाबादला अंतिम सामना रंगला. तसेच २०२५मध्ये बंगळुरूने जेतेपद मिळवल्यावर यंदाचा अंतिम सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल, असे अपेक्षित होते. मात्र बंगळुरूतील आमदारांची तिकिटांसाठी मागणी व तेथील मर्यादित प्रेक्षकक्षमतेचा विचार करता पुन्हा अहमदाबादला प्राधान्य देण्यात आले. २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकातील तसेच २०२६च्या टी-२० विश्वचषकातील अंतिम सामनासुद्धा अहमदाबादलाच झाला होता.

दरम्यान, बीसीसीआयने बुधवारी आयपीएलच्या बाद फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार २६ मे रोजी क्वालिफायर-१ सामना धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर होईल. मग २७ मे रोजी एलिमिनेटर लढत मुल्लानपूर (न्यू चंदिगड) येथे होईल. २९ मे रोजी क्वालिफायर-२ लढतसुद्धा मुल्लानपूरलाच खेळवण्यात येईल. मग रविवार, ३१ मे रोजी अहमदाबादला अंतिम सामना रंगेल. मुंबई, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू यांसारख्या शहरांना यावेळी बाद फेरीच्या सामन्यांपासून वंचित ठेवण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in