बिझनेस

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

भारतातील हिरे क्षेत्र गंभीर संकटाचा सामना करत आहे कारण गेल्या तीन वर्षांत आयात आणि निर्यात दोन्हीमध्ये मोठी घट झाली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतातील हिरे क्षेत्र गंभीर संकटाचा सामना करत आहे कारण गेल्या तीन वर्षांत आयात आणि निर्यात दोन्हीमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे कारखान्यावर थकित कर्जामुळे बंद झाल्याने कर्मचाऱ्यांनी नोकऱ्या गमावल्या आहेत, असे थिंक टँक जीटीआरआयने बुधवारी सांगितले.

या अहवालात म्हटले आहे की, निर्यातीत परतावा वाढला असताना, कमी झालेल्या ऑर्डरमुळे प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांना मागणी नाही. त्यामुळे वाढणारी स्पर्धा पाहता प्रक्रिया न केलेल्या रफ हिऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

या सर्व कारणांनी कारखाने थकित कर्जात वाढ होत आहे, कारखाने बंद पडणे आणि मोठ्या प्रमाणावर नोकरकपात होत आहे. दुर्दैवाने, गुजरातच्या हिरे क्षेत्रातील ६० हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे भारताचे हिरे क्षेत्र ज्या गंभीर आर्थिक आणि भावनिक ताणाला तोंड देत आहे, असे ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (जीटीआरआय) चे संस्थापक अजय श्रीवास्तव म्हणाले.

ते म्हणाले की या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि क्षेत्राचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तत्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे. थिंक टँकच्या आकडेवारीनुसार, रफ डायमंडची मागणी २४.५ टक्क्यांनी घसरल्याने २०२१-२२ मधील १८.५ अब्ज अमेरिकन डॉलरवरून २०२३-२४ मध्ये १४ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत घसरल्याने जागतिक बाजारपेठेतील कमकुवत मागणी आणि प्रक्रिया केलेल्या हिऱ्यांसाठी ऑर्डर कमी असल्याचे दिसून येतात.

ठाणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला प्रारंभ; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

“२० वर्षांपासूनचं स्वप्न अखेर साकार; तुम्ही फक्त वर्ल्डकप नव्हे, तर..."; विश्वविजेत्या भारतीय संघासाठी मिताली राजची इमोशनल पोस्ट

इतिहास रचला! भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी प्रथमच विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ

कोइंबतूर एअरपोर्टजवळील धक्कादायक घटना; कॉलेजच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिघांनी केला गँगरेप; प्रियकरालाही केली मारहाण

'कोणीतरी मराठी अभिनेत्री आहे, पण जोपर्यंत रंगेहाथ पकडत नाही...'; गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर नेमकं काय म्हणाली पत्नी सुनीता?