Canva
बिझनेस

तिमाहीत जीडीपी वृद्धी दराचा १५ महिन्यांचा नीचांक, एप्रिल-जूनमध्ये ६.७ टक्के

भारताचा जीडीपी वृद्धी दर एप्रिल-जून २०२४-२५ मध्ये ६.७ टक्क्यांपर्यंत घसरून १५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : भारताचा जीडीपी वृद्धी दर एप्रिल-जून २०२४-२५ मध्ये ६.७ टक्क्यांपर्यंत घसरून १५ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. मुख्यत्वे कृषी आणि सेवा क्षेत्रांच्या खराब कामगिरीचा हा फटका असल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत दिसून आले.

२०२२-२३ च्या एप्रिल-जून तिमाहीत सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी दर) ८.२ टक्क्यांनी वाढला होता. तथापि, चीनचा एप्रिल-जून २०२४ मध्ये जीडीपी दर ४.७ टक्के राहिल्यामुळे भारत ही सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था राहिली. तर २०२३ च्या जानेवारी-मार्च तिमाहीत जीडीपी दर ६.२ टक्क्यांचा यापूर्वीचा नीचांक नोंदवला होता.

आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत भारताची जीडीपी वाढ अपेक्षितपणे पाच तिमाहीपूर्वीच्या ७.८ टक्क्यांवरून ६.७ टक्क्यांपर्यंत मंदावला. तथापि, यंदा एप्रिल - जून तिमाहींमध्ये ‘जीव्हीए’ वाढ आश्चर्यकारकपणे वेगवान झाली असून हा दर ६.३ टक्क्यांवरून ६.८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आमच्या मते, जीडीपी वाढ मंदावणे हे धोक्याचे कारण नाही, असे इक्रा चीफ इकॉनॉमिस्ट, प्रमुख- संशोधन आणि आऊटरीच, आदिती नायर म्हणाल्या.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ) च्या आकडेवारीनुसार कृषी क्षेत्रातील सकल मूल्यवर्धित (जीव्हीए) वाढ २०२३-२४ च्या एप्रिल-जून तिमाहीत ३.७ टक्क्यांवरून २ टक्क्यांवर घसरली. ‘आर्थिक, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवा’ जीव्हीएमधील विस्तार देखील वर्षापूर्वीच्या तिमाहीत १२.६ टक्क्यांवरून ७.१ टक्क्यांवर घसरला.

Mumbai : मनोरी प्रकल्पाला CRZ ची मंजुरी; समुद्राचे खारे पाणी गोडे करणाऱ्या प्रकल्पाला गती

सिडकोच्या ताब्यातील स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित होणार; २० वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय, नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांना दिलासा

राज्यात बोगस दातांच्या डॉक्टरांना बसणार आळा; महाराष्ट्र राज्य दंत परिषदेकडून मराठी नोंदणी प्रमाणपत्रे जारी

Mumbai : जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा; तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली विकसित

Thane : प्रक्रिया केलेले पाणी महापालिका विकणार; पाणीटंचाईसह अवकाळी पावसाच्या दुहेरी संकटासाठी पालिका सज्ज