बिझनेस

५ वर्षांत आणखी ५० विमानतळे उभारण्याचे उद्दिष्ट: मंत्री नायडू

येत्या पाच वर्षांत आणखी ५० विमानतळे उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे आणि पुढील कामांसाठी तयारी केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : येत्या पाच वर्षांत आणखी ५० विमानतळे उभारण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे आणि पुढील कामांसाठी तयारी केली आहे. गेल्या १० वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट होऊन १५७ झाली आहे, असे नागरी विमान वाहतूक मंत्री के. राममोहन नायडू यांनी गुरुवारी सांगितले. नायडू म्हणाले की, पुढील पाच वर्षांत आणखी ५० आणि पुढील २० वर्षांत आणखी २०० विमानतळ विकसित केले जाण्याची अपेक्षा आहे.

राष्ट्रीय राजधानीत एअरबस इंडिया आणि दक्षिण आशिया मुख्यालय - प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री बोलत होते. रोजगार निर्मिती आणि व्यावसायिक उलाढालींना चालना देणारी विमानतळ इकोसिस्टम आणखी विकसित करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला.

महाराष्ट्रात पुढील ५ दिवस मुसळधार पावसाचे; हवामान विभागाचा मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राला वादळी वाऱ्याचा इशारा

Mumbai : धावत्या लोकलसमोर बायकोला ढकलून दिले; मुलुंड स्थानकावर धक्कादायक प्रकार, आरोपी नवरा अटकेत

Mumbai : गुढीपाडव्याच्या भव्य शोभायात्रेसाठी गिरगाव सज्ज; पारंपरिक वेशभूषेत हजारो मुंबईकर सहभागी होणार

ठाण्यात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकूळ; ४ लाखांचा ऐवज लुटला

“फोनवर बोलायचं असेल तर तुम्हीच नाटक करा!”; रंगमंचावर आस्ताद काळेचा संताप, चालू प्रयोग थांबवत प्रेक्षकाला सुनावलं