छायाचित्र : कॅनव्हा
बिझनेस

अगरबत्तीसाठी नवे BIS मानक; ८ हजार कोटींच्या बाजाराला चालना मिळणार

जगातील अगरबत्तीचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या भारताने, उत्पादनामध्ये काही कीटकनाशक रसायनांवर बंदी घालून ग्राहक सुरक्षेची खात्री करण्यासाठी आणि ८,००० कोटी रुपयांच्या अगरबत्तीच्या बाजाराला चालना देण्यासाठी एक नवीन गुणवत्ता मानक जारी केले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : जगातील अगरबत्तीचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या भारताने, उत्पादनामध्ये काही कीटकनाशक रसायनांवर बंदी घालून ग्राहक सुरक्षेची खात्री करण्यासाठी आणि ८,००० कोटी रुपयांच्या अगरबत्तीच्या बाजाराला चालना देण्यासाठी एक नवीन गुणवत्ता मानक जारी केले आहे.

ग्राहक सुरक्षा, घरातील हवेची गुणवत्ता, पर्यावरणीय शाश्वतता आणि नियामक अनुपालनावर वाढलेल्या दबावामुळे- तसेच जागतिक स्तरावर काही सुगंधित संयुगे आणि रसायनांवरील निर्बंधांमुळे अगरबत्तीसाठी ‘आयएस 19412:2025’ हे एक समर्पित भारतीय मानक विकसित करण्यात आले आहे. नवीन मानकाचे पालन करणारी उत्पादने बीआयएस मानक चिन्ह देखील वापरू शकतात, ज्यामुळे ग्राहकांना आत्मविश्वासाने माहितीपूर्ण निवड करण्यास मदत होईल, असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस) अगरबत्ती किंवा धूपकांडी बनवण्यासाठी वापरण्यास प्रतिबंधित असलेल्या पदार्थांची यादी जाहीर करते. त्यामध्ये एलेथ्रिन, परमेथ्रिन, सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन आणि फिप्रोनिल यांसारख्या काही कीटकनाशक रसायनांचा, तसेच बेंझिल सायनाइड, इथाइल ॲक्रिलेट आणि डायफेनिलामाइन यांसारख्या कृत्रिम सुगंधित मध्यवर्ती पदार्थांचा समावेश आहे. त्यापैकी अनेक पदार्थ मानवी आरोग्य, घरातील हवेची गुणवत्ता आणि पर्यावरणीय सुरक्षिततेवरील त्यांच्या संभाव्य परिणामांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिबंधित किंवा बंदी घातलेले आहेत, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

नवीन गुणवत्ता मानकात यंत्रनिर्मित, हस्तनिर्मित, पारंपरिक मसाला वर्गीकरण

नवीन गुणवत्ता मानक अगरबत्तीचे यंत्रनिर्मित, हस्तनिर्मित आणि पारंपरिक मसाला अगरबत्ती असे वर्गीकरण करते आणि कच्चा माल, जळण्याची गुणवत्ता, सुगंधाची कार्यक्षमता आणि रासायनिक मापदंडांसाठी आवश्यकता विहित करते, ज्यामुळे ग्राहकांसाठी सुरक्षित उत्पादने आणि सातत्यपूर्ण गुणवत्तेची खात्री होते. त्यामुळे ग्राहकांचा आत्मविश्वास वाढेल, नैतिक आणि शाश्वत उत्पादन पद्धतींना प्रोत्साहन मिळेल, पारंपरिक कारागिरांना पाठिंबा मिळेल आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश सुलभ होईल अशी अपेक्षा आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. भारतीय अगरबत्ती उद्योगाची वार्षिक उलाढाल सुमारे ८,००० कोटी रुपये असून, तो दरवर्षी १,२०० कोटी रुपयांची उत्पादने १५० हून अधिक देशांमध्ये निर्यात करतो, ज्यात अमेरिका, मलेशिया, नायजेरिया, ब्राझील आणि मेक्सिको या प्रमुख बाजारपेठा आहेत.

"माझ्या मुलीला जीवनदान दिलं"; पंतप्रधान मोदींनी माफ केल्यानंतर आईची भावनिक विनंती, म्हणाली - "तिला दत्तक घ्या..."

Aadhaar Security Tips : आधार फ्रॉडची भीती? फक्त २ मिनिटांत लॉक करा बायोमेट्रिक डेटा; जाणून घ्या सोपी पद्धत

अभिजीत दिपकेंच्या परदेशातील शिक्षणाचा खर्च कसा केला? RTI कार्यकर्त्याकडून चौकशीची मागणी

'पुन्हा एकत्र राहू' म्हणत बोलावलं; काही वेळातच घटस्फोटित पत्नीची हत्या, घटनेआधीची Reel व्हायरल

Bhiwandi Building Collapse : धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करा; महापौरांचे आदेश