प्रातिनिधिक छायाचित्र
बिझनेस

आणखी ३० लाख घरांच्या छतावर सौरऊर्जा बसवणार; पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजनेबाबत प्रल्हाद जोशी यांची माहिती

पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजनेंतर्गत देशभरात २० लाखांहून अधिक घरांमध्ये छतावरील सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यात आली आहे आणि लवकरच आणखी ३० लाख घरांमध्ये ही यंत्रणा जोडली जाईल, असे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी सांगितले.

Swapnil S

नवी दिल्ली : पंतप्रधान सूर्य घर मुफ्त बिजली योजनेंतर्गत देशभरात २० लाखांहून अधिक घरांमध्ये छतावरील सौरऊर्जा यंत्रणा बसवण्यात आली आहे आणि लवकरच आणखी ३० लाख घरांमध्ये ही यंत्रणा जोडली जाईल, असे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी सांगितले.

तथापि, देशभरात या योजनेंतर्गत एक कोटी लाभार्थ्यांसाठी छतावरील सौरऊर्जा उपकरणे बसवण्याचे उद्दिष्ट अर्धे पूर्ण करण्यासाठी मंत्र्यांनी कोणताही विशिष्ट कालावधी दिला नाही.

प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना आणि पंतप्रधान-कुसुम योजनांच्या राज्यांच्या आढावा बैठकीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना जोशी म्हणाले, आता (२० लाख (घरांमध्ये) छतावरील सौरऊर्जा यंत्रणा बसवण्याचे काम पूर्ण झाले आहे आणि लवकरच आम्ही आणखी ३० लाख घरे जोडणार आहोत. एकूणच, आमचे लक्ष्य (योजनेंतर्गत) एक कोटी घरांचे आहे. त्यांनी पुढे माहिती दिली की ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाही अशा सर्व लोकांसाठी त्यांनी युटिलिटी - नेतृत्वाखालील मॉडेलला मंजुरी दिली आहे.

काही राज्यांनी अतिशय जलद गतीने छतावरील सौरऊर्जा बसवण्याची योजना आखली आहे. त्यापैकी एक राज्य म्हणजे आंध्र प्रदेश. मुख्यमंत्र्यांनी मला भेटून सादरीकरण दिले होते. काही राज्यांनी आम्हाला हे उपयुक्तता-आधारित मॉडेल लागू करण्याची मागणी पाठवली होती. आम्ही ते मंजूर केले आहे, असे ते पुढे म्हणाले. ही योजना मागणी-आधारित आहे आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर लाभ दिले जातील. दोन्ही योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी त्यांनी राज्यांना सक्रिय राहण्यास त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री सूर्य घर योजनेंतर्गत, जवळजवळ निम्म्या लाभार्थ्यांना शून्य वीज बिल मिळत असल्याचे आपण आधीच पाहिले आहे. हे दीर्घकालीन शाश्वतता सुनिश्चित करताना नागरिकांना अर्थपूर्ण दिलासा देण्याचे मॉडेल दर्शवते. मी सर्व राज्यांना अशा पद्धतींचा अवलंब करण्यास आणि सक्रियपणे प्रोत्साहन देण्यास उद्युक्त करतो. विविध योजना, ग्रिड कनेक्टिव्हिटी आणि परवाना यामध्ये नियमांचे पालन करण्यात काही समस्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिवाळीपर्यंत साखरेची ‘शंभरी’? ऐन सणासुदीत सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका

Mumbai : रिक्षा बंदचा फटका! मराठी सक्तीबाबत अफवा, 'रास्ता रोको'; पश्चिम उपनगरांत प्रवाशांची गैरसोय

सट्टेबाजीमुळेच कांद्याची दरवाढ - केंद्राचा दावा; किरकोळ दरात ५९ टक्क्यांची वाढ, सरकारचा 'कांदा एक्स्प्रेस'चा धडाका

Mumbai : 'रुस्तमजी'मधील १२८ फ्लॅटधारकांवर कारवाई; मंत्री, माजी आमदारांच्या घरांतील अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

'कॉकरोच'चा ५ सप्टेंबरला दिल्लीत पुन्हा माेर्चा