बिझनेस

SEBI ने दिला इशारा; 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकीआधी विचार करा!

काही एसएमई कंपन्या त्यांच्या कामकाजाचे अवास्तव चित्र दाखवून शेअरच्या किमतीत फेरफार करण्याचा अवलंब करत असल्याने अशा कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे गुंतवू नये...

Swapnil S

नवी दिल्ली : काही एसएमई कंपन्या त्यांच्या कामकाजाचे अवास्तव चित्र दाखवून शेअरच्या किमतीत फेरफार करण्याचा अवलंब करत असल्याने अशा कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे गुंतवू नये, असा इशारा सेबीने बुधवारी दिला.

सेबीने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या लक्षात आले आहे की, नोंदणी झाल्यानंतर काही एसएमई कंपन्या किंवा त्यांचे प्रवर्तक सार्वजनिक घोषणा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामकाजाचे सकारात्मक चित्र निर्माण होते. बोनस इश्यू, स्टॉक स्प्लिट आणि प्राधान्य वाटप यासारख्या विविध कॉर्पोरेट कृतींनंतर अशा घोषणा केल्या जातात. या कृतींमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होते. त्यामुळे ते असे समभाग खरेदी करण्यास प्रवृत्त होतात. तथापि, अशा कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे गुंतवू नये किंवा अगदी हुशारीने पैशाची गुंतवणूक करावी, असे सेबीने सांगितले आहे.

Mumbai : मध्य रेल्वेच्या १८ स्थानकांवर सुरू होणार आपत्कालीन वैद्यकीय कक्ष; 'या' ठिकाणी मिळणार त्वरित मदत

Thane : पाणीटंचाई टाळण्यासाठी नैसर्गिक जलस्रोतांचा आधार; उन्हाळ्यात कुपनलिका व विहिरींच्या पाण्याच्या वापराचा निर्णय

लाडकी बहीण योजना : e-KYC मुदत वाढली, पण सर्वांसाठी नाही; फक्त 'या' महिलांनाच मिळणार संधी, संकेतस्थळावर दिला स्पष्ट संदेश

Mumbai : थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीची नोटीस...अन्यथा कायदेशीर कारवाई; डॉ. अश्विनी जोशी यांचा इशारा

ज्येष्ठांच्या पालनपोषणाचा कायदा म्हणजे मालमत्तेतून बेदखल करण्याचा पर्याय नाही; उच्च न्यायालयाचा निर्वाळा