बिझनेस

SEBI ने दिला इशारा; 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकीआधी विचार करा!

काही एसएमई कंपन्या त्यांच्या कामकाजाचे अवास्तव चित्र दाखवून शेअरच्या किमतीत फेरफार करण्याचा अवलंब करत असल्याने अशा कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे गुंतवू नये...

Swapnil S

नवी दिल्ली : काही एसएमई कंपन्या त्यांच्या कामकाजाचे अवास्तव चित्र दाखवून शेअरच्या किमतीत फेरफार करण्याचा अवलंब करत असल्याने अशा कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे गुंतवू नये, असा इशारा सेबीने बुधवारी दिला.

सेबीने एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्या लक्षात आले आहे की, नोंदणी झाल्यानंतर काही एसएमई कंपन्या किंवा त्यांचे प्रवर्तक सार्वजनिक घोषणा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या कामकाजाचे सकारात्मक चित्र निर्माण होते. बोनस इश्यू, स्टॉक स्प्लिट आणि प्राधान्य वाटप यासारख्या विविध कॉर्पोरेट कृतींनंतर अशा घोषणा केल्या जातात. या कृतींमुळे गुंतवणूकदारांमध्ये सकारात्मक भावना निर्माण होते. त्यामुळे ते असे समभाग खरेदी करण्यास प्रवृत्त होतात. तथापि, अशा कंपन्यांच्या समभागांमध्ये गुंतवणूकदारांनी त्यांचे पैसे गुंतवू नये किंवा अगदी हुशारीने पैशाची गुंतवणूक करावी, असे सेबीने सांगितले आहे.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास