X- @iamsrk, @ajaydevgn, @iTIGERSHROFF
मनोरंजन

जाहिरातप्रकरणी शाहरूखसह अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस

जयपूर : पानमसाला ब्रँड ‘विमल’च्या जाहिरातप्रकरणी सुपरस्टार शाहरूख खान, अभिनेता अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस जारी करण्याचे आदेश जयपूरच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत. योगेंद्र सिंह यांनी केलेल्या तक्रारीनंतर मंचाचे अध्यक्ष ग्यारसीलाल मीना आणि सदस्य हेमलता अग्रवाल यांनी बॉलिवूडच्या या कलाकारांना नोटीस जारी करण्यास सांगितले. पानमसाल्याची जाहिरात फसवणूक करणारी आहे.

Swapnil S

जयपूर : पानमसाला ब्रँड ‘विमल’च्या जाहिरातप्रकरणी सुपरस्टार शाहरूख खान, अभिनेता अजय देवगण आणि टायगर श्रॉफला नोटीस जारी करण्याचे आदेश जयपूरच्या ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिले आहेत. योगेंद्र सिंह यांनी केलेल्या तक्रारीनंतर मंचाचे अध्यक्ष ग्यारसीलाल मीना आणि सदस्य हेमलता अग्रवाल यांनी बॉलिवूडच्या या कलाकारांना नोटीस जारी करण्यास सांगितले. पानमसाल्याची जाहिरात फसवणूक करणारी आहे. पानमसाल्याच्या प्रत्येक दाण्यात केसर असल्याचा दावा केला आहे. पानमसाल्यात केसर असल्याचा दावा करून ते खोटा प्रचार करत असल्याचा आरोप योगेंद्र सिंह यांनी केला. या फसव्या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली.

‘बोलो जुबां केसरी’ या टॅगलाइनची ही जाहिरात आहे. त्यात दावा केला की, पानमसाल्यात केसर आहे. हे पॅकेट उघडताच त्यातून केसर निघते. या जाहिरातीत शाहरूख खान, अजय देवगण व टायगर श्रॉफ दिसतात. या जाहिरातीवरून वाद झाल्यानंतर त्यांनी यातून अंग काढून घेतले. विमल इलायचीचा अक्षय कुमार हा ब्रँड ॲॅम्बेसिडर होता. सोशल मीडियावरून टीका झाल्यानंतर अक्षय कुमारने माफी मागून त्याने ब्रँड ॲॅम्बेसिडरपदाचा राजीनामा दिला. मी तंबाखूचे समर्थन करत नाही, तसेच त्याची जाहिरात स्वीकारत नाही, असे अक्षय कुमारने सांगितले होते.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’