मनोरंजन

पद्मभूषण पुरस्कार विजेत्या गायिका वाणी जयराम यांचे वयाच्या 77 वर्षी निधन

वृत्तसंस्था

संगीत जगतातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध पद्मभूषण पुरस्कार विजेत्या गायिका वाणी जयराम यांचे वयाच्या 77 वर्षी निधन झाले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, वाणी चेन्नईतील राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्या. याबाबत अधिक तपशील अद्याप समोर आलेला नाही.


वाणी जयराम यांच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत कोणतीही माहिती नाही. वाणी जयराम यांना याच वर्षी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वाणी यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून, यामुळे संगीतक्षेत्रात शोककळा पसरली आहे.
10 हजारांहून अधिक गाण्यांना आवाज देणाऱ्या जयराम यांनी नुकतीच व्यावसायिक गायक म्हणून संगीत क्षेत्रात 50 वर्षे पूर्ण केली आहेत. वाणी यांनी आपल्या कारकिर्दीत 10,000 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत. वाणी जयराम यांनी आरडी बर्मन, केव्ही महादेवन, ओपी नय्यर आणि मदन मोहन यांच्यासह अनेक प्रसिद्ध संगीतकारांसोबत काम केले.

जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान; उत्तर प्रदेशात सर्वात कमी प्रतिसाद, तर 'या' राज्यात सर्वाधिक टक्केवारी

दुसऱ्या टप्प्यातही यादीत घोळ; अनेकजण मतदानाविना परतले, प्रशासनाची अनास्था कायम

मध्य रेल्वेचा रविवारी मेगाब्लॉक; कितीवाजेपर्यंत प्रवाशांची गैरसोय? कुठे विलंबाने धावणार लोकल? वाचा सविस्तर