मनोरंजन

सलमान खानला पुन्हा धमकीचा मेसेज;'बिष्णोई मंदिरात माफी माग, नाहीतर पाच कोटी दे'

सिनेअभिनेता सलमान खान याला पुन्हा बिष्णोई टोळीच्या नावाने धमकीचा मेसेज आला आहे. बिष्णोई समाजाच्या मंदिरात जाऊन सलमानने माफी मागावी नाहीतर पाच कोटी रुपयांची खंडणीची रक्कम द्यावी, असे मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : सिनेअभिनेता सलमान खान याला पुन्हा बिष्णोई टोळीच्या नावाने धमकीचा मेसेज आला आहे. बिष्णोई समाजाच्या मंदिरात जाऊन सलमानने माफी मागावी नाहीतर पाच कोटी रुपयांची खंडणीची रक्कम द्यावी, असे मेसेजमध्ये नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कर्नाटक येथून विक्रम नावाच्या एका संशयित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला सतत धमकीचे मेसेज येत आहे. आता सलमानला पुन्हा बिष्णोई टोळीच्या नावाने नवीन धमकी प्राप्त झाली आहे. मेसेज पाठविणाऱ्या अज्ञात व्यक्तीने तो लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ असल्याचे म्हटले आहे. काळवीट शिकारीच्या कथित घटनेवरून सलमानने बिष्णोई समाजाच्या मंदिरात जाऊन माफी मागावी, नाहीतर बिष्णोई टोळीला पाच कोटीची खंडणीची रक्कम द्यावी. ही रक्कम दिली नाहीतर परिणाम वाईट होतील, असा धमकीवजा इशारा मेसेजमध्ये देण्यात आला आहे.

हा मेसेज वरळी येथील वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईप मोबाईल क्रमांकावर सोमवारी आला होता. तपासादरम्यान हा मेसेज कर्नाटक येथून पाठविण्यात आल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने विक्रम नावाच्या एका ३५ वर्षांच्या व्यक्तीला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले आहे. त्याची पोलिसाकडून चौकशी सुरू आहे. त्याला लवकरच पुढील चौकशीसाठी मुंबईत आणले जाणार असल्याचे बोलले जाते.

"व्हिडीओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही"; CJP आंदोलकांच्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे भाष्य, तातडीच्या सुनावणीस नकार

आता AI ठेवणार पक्ष्यांवर नजर! महाराष्ट्रात उभारलं जाणार देशातील पहिलं AI-आधारित पक्षी अभयारण्य

Mumbai Rains : पावसात अडकलेल्या मुंबईकरांना 'Vi'चा दिलासा! स्टोअरमध्ये घेता येणार आश्रय, मोबाईल चार्जिंगचीही सोय

१८ वर्षीय तरुणाने घातला ६५ कोटींचा गंडा! AI च्या मदतीने बनवले १२१ बनावट अ‍ॅप्स

Mumbai Rain Alert : मुंबईत मुसळधार पावसासह भरतीचाही धोका; वादळी वाऱ्याचा इशारा, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन