आंतरराष्ट्रीय

भाजपचे हिंदुत्व वेद-उपनिषदविरोधी राहुल गांधी यांची टीका

युरोपच्या दौऱ्यावर गेलेल्या राहुल गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर टीका केली

नवशक्ती Web Desk

पॅरिस : जे लोक काही बाबींचे नाव बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, ते इतिहास नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत. मी हिंदूंचे धर्मग्रंथ, वेद-उपनिषद वाचले असून भाजप जे काही करतेय, ते हिंदूवादी नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली.

युरोपच्या दौऱ्यावर गेलेल्या राहुल गांधी यांनी पुन्हा केंद्र सरकारवर टीका केली. पॅरिसमध्ये त्यांनी ‘इंडिया-भारत’ नावावरून सुरू असलेला वाद, हिंदुत्व या मुद्यावर मते मांडली. ते म्हणाले की, ‘‘भारताच्या राज्यघटनेत इंडिया म्हणजे ‘दॅट इज भारत’ म्हणजे राज्याचा संघ म्हणून म्हटले आहे. विविध राज्यांचा बनून ‘इंडिया’ किंवा ‘भारत’ बनला आहे. या राज्यातील सर्व जनतेचा आवाज ऐकला जातो. कोणाचाही आवाज दाबला जात नाही किंवा त्यांना घाबरवले जात नाही.’’

गांधी म्हणाले की, ‘‘मी गीता वाचली असून उपनिषदांचा अभ्यास केला आहे. हिंदूंची अन्य पुस्तके वाचली आहेत. मात्र, भाजप जे काही करते, त्यातील एकही बाब हिंदुत्ववादी नाही. ‘इंडिया’ म्हणजेच भारतीय राज्यांचा संघ आहे. जे लोक काही बाबींचा नाव बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, ते इतिहास नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत.’’

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राहुल म्हणाले की, ‘इंडिया दॅट इज भारत’ हा सर्व जनतेचे प्रतिनिधित्व करते. विकेंद्रीकृत व लोकशाही भारत हा राजकीयदृष्ट्या पुढे जात आहे.

केंद्राच्या तात्पुरत्या बंदीनंतर प्ले स्टोअरवर Telegram पुन्हा सुरू; पण ॲप स्टोअरवरून अजूनही गायब

Lucknow Fire : लग्नाचं स्वप्न झालं भस्मसात! जिथे प्रेम फुललं, तिथेच जोडप्याचा अंत, लखनऊ अग्निकांडमधील मन सुन्न करणारी घटना

Ulhasnagar : २०० हून अधिक आधारकार्ड कचऱ्यात

Mumbai : ‘ओसी’ नसलेल्या इमारतींना दिलासा; ८०० चौरस फुटांपर्यंत सदनिका असलेल्या इमारतींना मिळणार OC, राज्य सरकारची मंजुरी

मराठवाड्यात फक्त २ टक्के पेरण्या; पाऊस लांबल्याचा परिणाम