संग्रहित छायाचित्र पीटीआय
आंतरराष्ट्रीय

भारत-चीन तणाव निवळला! नियंत्रण रेषेवरून माघारीची प्रक्रिया पूर्ण

भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील दोन्ही देशांच्या सैनिकांची माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन्ही देशांचे सैन्य आता आपल्या जागेतील चौक्या हटवण्याचे काम करत आहेत...

Swapnil S

नवी दिल्ल : भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील दोन्ही देशांच्या सैनिकांची माघारीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन्ही देशांचे सैन्य आता आपल्या जागेतील चौक्या हटवण्याचे काम करत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

२१ ऑक्टोबर रोजी भारताने पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्तीबाबत चीनसोबत एका कराराची घोषणा केली. त्यामुळे चार वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष संपुष्टात आला आहे.

संरक्षण क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार, भारत व चिनी सैनिकांची माघारीची प्रक्रिया ९० टक्के पूर्ण झाली आहे. आता दोन्ही देशांच्या चौक्या हटवण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया मंगळवारपर्यंत पूर्ण होईल.

आता दोन्ही देशांची गस्त सुरू होणार

२९ ऑक्टोबरपर्यंत देपसांग व देमचोक येथून सैन्य माघारी घेण्याचे लक्ष्य भारतीय लष्कराने ठेवले होते. त्यानंतर आता दोन्ही देशांची गस्त सुरू होईल. अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद सोडवण्याच्या दृष्टीने भारत प्रयत्न करत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर एप्रिल २०२० पूर्वीची स्थिती निर्माण होऊ शकेल, असे सूत्रांनी सांगितले.

अमेरिका-इराण शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीवर अनिश्चिततेचे सावट; युद्धबंदीची मुदत आज संपणार; बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष

सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर; रुग्णसेवेसह शासकीय कामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

अमली पदार्थांची तस्कर अश्विनी पॉल अटकेत; मूळची पुण्याची असलेली बारबाला, नंतर बनली ड्रग्ज माफिया क्वीन

नाशिक TCS प्रकरण : संशयित निदा खानच्या जामिनावर २७ एप्रिलला सुनावणी

अरविंद केजरीवाल यांची याचिका फेटाळली; दिल्ली मद्य धोरण प्रकरणात न्या. स्वर्णकांता शर्मा सुनावणीवर ठाम