Photo : X (@MORRIS80766176)
आंतरराष्ट्रीय

मेक्सिकोत फुटबॉलच्या सामन्यादरम्यान अंदाधुंद गोळीबार; ११ ठार

मेक्सिकोमध्ये फुटबॉलच्या सामन्यादरम्यान अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुआनाजुआतो राज्यातीतील सलामांका शहरात घडली.

Swapnil S

मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये फुटबॉलच्या सामन्यादरम्यान अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला असून १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना गुआनाजुआतो राज्यातीतील सलामांका शहरात घडली. या घटनेमुळे सामन्यादरम्यान गोंधळ उडाला. सर्वजण सैरावैरा पळू लागले. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदूकधाऱ्याने अंदाधुंद गोळीबार करायला सुरूवात केली. घटनास्थळावर १० जणांचा मृत्यू झाला. तर या घटनेत जखमी झालेल्या एका व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. या गोळीबारात जखमी झालेल्या १२ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

सलामांकाचे महापौर सेझर प्रीटो यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, जखमींमध्ये एक महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. या घटनेमुळे शहराला खूप दुःख झाले आहे. हिंसाचार नियंत्रित करण्यासाठी त्यांनी राष्ट्रपती क्लॉडिया शीनबॉम यांना त्वरित मदत करण्याचे आवाहन केले आहे. दुर्दैवाने काही गुन्हेगारी गट अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांना यश येणार नाही. पोलिसांनी या गोळीबाराच्या घटनेची चौकशी सुरू केली आहे. परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी ग्वानाजुआटोमध्ये मेक्सिकोमध्ये सर्वाधिक हत्या झाल्या होत्या. स्थानिक टोळी सांता रोसा डी लिमा आणि शक्तिशाली जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल यांच्यात हिंसक संघर्ष सुरू आहेत. मेक्सिकन सरकारच्या मते, २०२५ मध्ये देशभरात हत्येचा दर २०१६ नंतर सर्वात कमी होता, दर १००,००० लोकांमागे १७.५ हत्या झाल्या.

Ajit Pawar Death : दुसऱ्यांदा लँडिंगच्या प्रयत्नावेळी क्रॅश झाले विमान; पायलटचे अखेरचे शब्द...ओह शिट...ओह शिट

अजित दादांना उद्या अखेरचा निरोप! पार्थिवावर सकाळी ११ वाजता बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान मैदानात अंत्यसंस्कार

मोठी बातमी! विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू

"दिलदार मित्र गेला..." अजितदादांच्या निधनानंतर फडणवीसांनी व्यक्त केले दुःख; राज्यात तीन दिवसांचा दुखवटा; आज शासकीय सुट्टी

उद्ध्वस्त...अजितदादांच्या मृत्यूनंतर सुप्रिया सुळेंनी एकाच शब्दात व्यक्त केल्या भावना