विविधता हेच भारताचे सौंदर्य - मोहन भागवत  (संग्रहित छायाचित्र)
आंतरराष्ट्रीय

विविधता हेच भारताचे सौंदर्य - मोहन भागवत

‘कठीण काळात इतरांना मदत करणे ही भारताची जुनी परंपरा आहे. जगात कुठेही संकट आले आणि भारताकडे मदत मागितली गेली, तेव्हा भारताने कधीही हात झटकून नकार दिला नाही.

Swapnil S

टोरंटो : ‘कठीण काळात इतरांना मदत करणे ही भारताची जुनी परंपरा आहे. जगात कुठेही संकट आले आणि भारताकडे मदत मागितली गेली, तेव्हा भारताने कधीही हात झटकून नकार दिला नाही. अनेक वेळा भारताने न मागताही इतरांना मदत केली आहे’, असे रोखठोक मत सरसंघचालक मोहन भागवत सोमवारी टोरंटो येथे ‘हिंदू विश्व बंधु’ कार्यक्रमात व्यक्त केले. ‘भारतात विविधता हे एकतेच्या विरोधात नाही, तर ते तिचे सौंदर्य आहे. देशात वेगवेगळ्या जाती, पंथ, भाषा आणि संस्कृती आहेत, पण त्या सर्व एकाच समाजाचा भाग आहेत’. ही विविधता स्वीकारण्याचे आणि तिचा सन्मान करण्याचे आवाहनही भागवत यांनी केले.

‘हे माझे, ते तुझे’, अशा विचारांमधून बाहेर येण्याची गरज आहे. वेगवेगळी रूपे आणि ओळख असूनही सर्वांमध्ये एकच दिव्यता आहे. म्हणून इतरांना वेगळे किंवा परके मानण्याऐवजी सर्वांशी बंधुत्वाची आणि सेवेची भावना ठेवली पाहिजे’, असे ठोस मत त्यांनी व्यक्त केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : आजपासून रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार; भाड्यात १ ते २ रुपयांची वाढ

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणेकरांना आवाहन

राज्यातील २ कोटी ६ लाख मतदार वगळले; महाराष्ट्राची प्रारुप मतदार यादी जाहीर; १७ लाख दुबार, तर ३४ लाख मृत्यू झालेले मतदार

मुंबईकडे जाण्याची तयारी करा; मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन

होऊ दे खर्च! फडणवीस, शिंदे, पवारांच्या बंगल्यांमध्ये ‘पाहुणचार’; अडीच वर्षांत २१ कोटींची उधळण, फडणवीसांपेक्षा शिंदेंचा खर्च दुप्पट