AFP
आंतरराष्ट्रीय

भारताने ठरवल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकते; युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे आवाहन

भारताने ठरवल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकते, असे आवाहन युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केले. रशियन अर्थव्यवस्थेत भारताचे मोठे योगदान आहे. भारताने रशियाकडून तेल घेणे बंद केल्यास रशिया शस्त्रसंधीला तयार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Swapnil S

कीव्ह : भारताने ठरवल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकते, असे आवाहन युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केले. रशियन अर्थव्यवस्थेत भारताचे मोठे योगदान आहे. भारताने रशियाकडून तेल घेणे बंद केल्यास रशिया शस्त्रसंधीला तयार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीनंतर जेलेन्स्की म्हणाले की, रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्याची चर्चा आम्ही केली. या युद्धामुळे जगाने रशियावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले आहेत. मात्र, भारताचे दरवाजे उघडे आहेत. भारताने रशियाकडून तेल आयात करणे बंद केल्यास पुतीन यांच्यासाठी मोठे आव्हान असेल. युद्ध सुरू असताना भारत व चीनकडून पुतीन यांना अब्जावधी रुपयांची मदत मिळत आहे, असेही ते म्हणाले.

रशिया-युक्रेन युद्धाबाबत संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाबाबत भारताच्या भूमिकेबाबत झेलेन्स्की म्हणाले की, भारताने याबाबत आम्हाला साथ दिली नाही, याबाबत आम्हाला खंत आहे. भविष्यात हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी आम्ही भारताशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू. भारताने आमची बाजू उचलून धरावी. भारत हे युद्ध थांबवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो, असे ते म्हणाले.

महाराष्ट्र जनविश्वास अध्यादेश : किरकोळ अपराधासाठी आता फक्त दंड, तुरुंगवास नाही; ७ कायद्यांतील छोटे गुन्हे 'डिक्रिमिनलाइज'

Navi Mumbai : वन खात्याच्या बोटचेप्या धोरणाचा फटका महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना; आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटीसह अनेकांवर परिणाम

तिरुमला तिरुपती देवस्थानास वांद्रे येथील जमीन; ३० वर्षांसाठी नाममात्र १ रुपया भाडे; ३९५ चौ.मी जमिनीवर पार्किंग, कार्यालय

Mumbai : बिग बींची स्मार्ट गुंतवणूक! अमिताभ बच्चन यांनी विकले गोरेगावमधील दोन आलिशान फ्लॅट्स; १३ वर्षांत तब्बल ३.८ कोटींचा नफा

'पान मसाला' जाहिरातीवरून सलमान खानला नोटीस; भाजप नेत्याने दाखल केली तक्रार