AFP
आंतरराष्ट्रीय

भारताने ठरवल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकते; युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे आवाहन

भारताने ठरवल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकते, असे आवाहन युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केले. रशियन अर्थव्यवस्थेत भारताचे मोठे योगदान आहे. भारताने रशियाकडून तेल घेणे बंद केल्यास रशिया शस्त्रसंधीला तयार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Swapnil S

कीव्ह : भारताने ठरवल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकते, असे आवाहन युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केले. रशियन अर्थव्यवस्थेत भारताचे मोठे योगदान आहे. भारताने रशियाकडून तेल घेणे बंद केल्यास रशिया शस्त्रसंधीला तयार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीनंतर जेलेन्स्की म्हणाले की, रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्याची चर्चा आम्ही केली. या युद्धामुळे जगाने रशियावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले आहेत. मात्र, भारताचे दरवाजे उघडे आहेत. भारताने रशियाकडून तेल आयात करणे बंद केल्यास पुतीन यांच्यासाठी मोठे आव्हान असेल. युद्ध सुरू असताना भारत व चीनकडून पुतीन यांना अब्जावधी रुपयांची मदत मिळत आहे, असेही ते म्हणाले.

रशिया-युक्रेन युद्धाबाबत संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाबाबत भारताच्या भूमिकेबाबत झेलेन्स्की म्हणाले की, भारताने याबाबत आम्हाला साथ दिली नाही, याबाबत आम्हाला खंत आहे. भविष्यात हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी आम्ही भारताशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू. भारताने आमची बाजू उचलून धरावी. भारत हे युद्ध थांबवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो, असे ते म्हणाले.

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती

LPG ग्राहकांनो लक्ष द्या! e-KYC अनिवार्य; मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करा ही प्रक्रिया