AFP
आंतरराष्ट्रीय

भारताने ठरवल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकते; युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचे आवाहन

भारताने ठरवल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकते, असे आवाहन युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केले. रशियन अर्थव्यवस्थेत भारताचे मोठे योगदान आहे. भारताने रशियाकडून तेल घेणे बंद केल्यास रशिया शस्त्रसंधीला तयार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Swapnil S

कीव्ह : भारताने ठरवल्यास रशिया-युक्रेन युद्ध थांबू शकते, असे आवाहन युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केले. रशियन अर्थव्यवस्थेत भारताचे मोठे योगदान आहे. भारताने रशियाकडून तेल घेणे बंद केल्यास रशिया शस्त्रसंधीला तयार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीनंतर जेलेन्स्की म्हणाले की, रशियाकडून भारत तेल खरेदी करत असल्याची चर्चा आम्ही केली. या युद्धामुळे जगाने रशियावर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले आहेत. मात्र, भारताचे दरवाजे उघडे आहेत. भारताने रशियाकडून तेल आयात करणे बंद केल्यास पुतीन यांच्यासाठी मोठे आव्हान असेल. युद्ध सुरू असताना भारत व चीनकडून पुतीन यांना अब्जावधी रुपयांची मदत मिळत आहे, असेही ते म्हणाले.

रशिया-युक्रेन युद्धाबाबत संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाबाबत भारताच्या भूमिकेबाबत झेलेन्स्की म्हणाले की, भारताने याबाबत आम्हाला साथ दिली नाही, याबाबत आम्हाला खंत आहे. भविष्यात हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी आम्ही भारताशी चर्चा करण्याचा प्रयत्न करू. भारताने आमची बाजू उचलून धरावी. भारत हे युद्ध थांबवण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतो, असे ते म्हणाले.

Mumbai : पाणी टँकरचालकांचा उद्यापासून संप; बडे टॉवर, कार्यालये यांना फटका बसण्याची भीती

खिशाला कात्री! केस कापण्यापासून दाढीपर्यंत सर्व महागले; नवे दर जाणून घ्या

Navi Mumbai : "कित्येक रात्री झोपलेच नाही" म्हणत महिलेचा उद्रेक; रात्रीच्या वीजखंडितीने नागरिक त्रस्त, Video

स्वयंपाकाचा गॅस पुन्हा महागला; सिलिंडरच्या किंमतीत २९ रुपयांची वाढ, तुमच्या शहरातील दर किती?

MPSC च्या गुणवंताना खासगी नोकरीची संधी; UPSC च्या धर्तीवर निर्णय