आंतरराष्ट्रीय

...तर भारताचा 'टॅरिफ' कमी करू! व्हाइट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांचे वक्तव्य

व्हाईट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांनी युक्रेन संघर्षाचा उल्लेख "मोदींचे युद्ध" असा केला आहे. भारताने सवलतीच्या दरात रशियन तेल खरेदी केल्याने रशियाच्या आक्रमकतेला चालना मिळाली आहे आणि अमेरिकन करदात्यांवर त्याचा भार पडला आहे.

Swapnil S

वॉशिंग्टन : व्हाईट हाऊसचे सल्लागार पीटर नवारो यांनी युक्रेन संघर्षाचा उल्लेख "मोदींचे युद्ध" असा केला आहे. भारताने सवलतीच्या दरात रशियन तेल खरेदी केल्याने रशियाच्या आक्रमकतेला चालना मिळाली आहे आणि अमेरिकन करदात्यांवर त्याचा भार पडला आहे. जर भारताने रशियन तेल खरेदी करणे थांबवले तर त्यांच्यावरील २५ टक्के 'टॅरिफ' लगेचच कमी होऊ शकतो, असा दावा नवारो यांनी केला आहे.

एका मुलाखतीत पीटर नवारो यांनी रशिया-युक्रेन संघर्षाचा उल्लेख करत म्हटले की, शांततेचा मार्ग अंशतः नवी दिल्लीतून जातो. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ५० टक्के कर लादला आहे, जो बुधवारपासून लागू झाला आहे. पाश्चात्य दबावाला न जुमानता भारताने रशियन कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्याबद्दल भारताला दंड म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर 'टॅरिफ' लादण्यात आले आहे.

अमेरिका भारताशी चर्चा करत आहे का आणि 'टॅरिफ' कमी होण्याची काही शक्यता आहे का, असे विचारले असता नवारो म्हणाले की, हे खरोखर सोपे आहे. जर भारताने रशियन तेल खरेदी करणे थांबवले तर उद्याच त्यांना 'टॅरिफ' मधून २५ टक्के सूट मिळू शकते.

उद्धट वागणे

नवारो भारताच्या 'टॅरिफ' बाबतच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त करत म्हणाले, माझ्यासाठी त्रासदायक बाब म्हणजे भारतीय याबाबतीत खूप उद्धटपणे वागत आहेत. ते म्हणत आहेत की, आम्ही कुठे जास्त 'टॅरिफ' आकारतो, हे आमचे सार्वभौमत्व आहे. आम्ही ज्याच्याकडून हवे त्याच्याकडून तेल खरेदी करू शकतो.

रशियाला भारताचे बळ

नवारो यांनी भारतावर रशियाच्या युद्ध यंत्रणेला आर्थिक मदत केल्याचा आरोप केला. भारत रशियन तेल सवलतीत खरेदी करतो आणि रशिया यातून आपल्या युद्धयंत्रणेला बळ देऊन युक्रेनियन लोकांना मारतो, असे ते म्हणाले.

रशियाचे अमेरिकेला प्रत्युत्तर

"जर तेल स्वस्त आहे, तर तुम्हीही विकत घ्या. हा भारत आणि आमच्यातील आर्थिक संबंधाचा भाग आहे. यातून युद्धाला कोणताही निधी पुरवला जात नाही. दोन्ही देश आपसातील आर्थिक संबंध यापुढेही कायम ठेवतील", असे रशियाच्या राजनैतिक अधिकाऱ्याने म्हटले आहे. भारताचे पैसे युद्धात वापरले जात नाहीत, हेही त्यांनी स्पष्ट केले.

Nerul–Mumbai Ferry : फक्त ३० मिनिटांत मुंबई! १५ डिसेंबरपासून नेरुळ-भाऊचा धक्का फेरी सुरू होणार; भाडे किती? जाणून घ्या डिटेल्स

Goa Nightclub Fire Update : लुथ्रा बंधू थायलंडच्या फुकेतमधून ताब्यात; भारतात आणण्यासाठी अधिकाऱ्यांची टीम रवाना

लाज आणली! महिला डॉक्टरांचा स्पर्श व्हावा यासाठी आजारपणाचं नाटक; कॅनडात भारतीय वंशाच्या तरुणाला अटक

IND vs SA : सूर्यकुमारच्या कामगिरीची चिंता! भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आज मुल्लानपूर येथे रंगणार दुसरा टी-२० सामना

परदेशी वारीसाठी ६० कोटी रुपये जमा करा, अन्यथा बँक गॅरंटी द्या; राज कुंद्रा - शिल्पा शेट्टीला उच्च न्यायालयाने सुनावले