लाईफस्टाईल

शरीराला भरपूर ऊर्जा देण्याचे काम करते केळी

Rutuja Karpe

केळी हे असे फळ आहे जे शरीराला भरपूर ऊर्जा देण्याचे काम करते. परंतु, जर तुम्हाला श्वासाचा आजार असेल किंवा खोकला किंवा सर्दी असेल तर थंड वातावरणात रात्री केळे खाणे टाळावे. सायनसचा त्रास असेल तर केळी मर्यादित प्रमाणात खावी, परंतु ज्या लोकांना अशी कोणतीही आरोग्य समस्या नाही, त्यांनी या ऋतूत केळी खाणे अजिबात वर्ज्य करू नये.

1. जीवनसत्त्वे आणि खनिजे
हिवाळ्यात हाडांशी संबंधित समस्या वाढतात. दररोज आवश्यक प्रमाणात कॅल्शियमसह हाडांची घनता राखली जाते आणि ती मजबूत होतात. केळीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मँगनीज, मॅग्नेशियम, लोह, फोलेट, नियासिन, रिबोफ्लेविन आणि बी6 सारखी सर्व आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. ही सर्व पोषकतत्व शरीराला निरोगी ठेवतात.

 2. केळीत आहे भरपूर फायबर
केळीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पोट बराच वेळ भरल्यासारखे वाटते. यामुळेच लवकर भूक लागत नाही म्हणून नाश्त्यात केळी खावीत. आयुर्वेदानुसार रात्री केळी खाणे टाळावे कारण यामुळे खोकला आणि सर्दी वाढू शकते.

3. केळी हृदयासाठी चांगले
केळी खाल्ल्याने हृदयविकार आणि उच्च रक्तदाब टाळता येतो. फायबरयुक्त पदार्थ हृदयरोगांपासून संरक्षण करतात. केळ्यामध्ये असलेले पोटॅशियम हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते, तसेच मेंदूला सतर्क ठेवते.

4. भूकेवर नियंत्रण
जर तुम्हाला मध्यरात्री भूक लागली असेल किंवा काही गोड खाण्याची इच्छा होत असेल तर आहारात केळीचा समावेश करा. हे तुम्हाला साखर आणि जास्त कॅलरी असलेल्या गोष्टी खाण्यापासून वाचवेल. केळी जीवनसत्त्वे आणि फायबरने समृद्ध असण्यासोबतच मध्यरात्री भूक दूर करण्याचे काम करते. जर तुम्ही संध्याकाळी जिममध्ये जात असाल किंवा काही व्यायाम करत असाल तर त्यानंतर केळी खाण्याची सवय लावा. 

5. चांगली झोप लागते
संध्याकाळी केळी खाणे ही चांगली सवय आहे. पोटॅशियमयुक्त केळी दिवसभराच्या मेहनतीनंतर स्नायूंना आराम देण्यास मदत करतात. संध्याकाळी उशिरा एक-दोन केळी खाल्ल्याने थकवा कमी होतो आणि झोप चांगली लागते.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस