लाईफस्टाईल

तुमचे मानसिक आरोग्य चांगले आहे का?

तुमचे मानसिक आरोग्य चांगले आहे की नाही ? मानसिक संतुलन योग्य नसल्याची ही आहेत लक्षणे.

Rutuja Karpe

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात काही गोष्टी मनासारख्या घडतात तर, काही मनावेगळ्या घडतात, ऑफिसचा ताण, घर, वैयक्तिक आयुष्य अश्या एक न अनेक गोष्टींचा समतोल साधत आपण पुढे चालत असतो. पण काही गोष्टी अश्या घडतात की, त्यावरून मानसिक संतुलन बिघडते. तुमचे मानसिक आरोग्य चांगले आहे का? अशी अनेक लक्षणे आहेत, ज्यांमुळे तुमचे मानसिक आरोग्य चांगले नाही हे लक्षात येतं. त्या लक्षणांबद्दल जाणून घेऊया.  

कमी झोप येणे : तुम्ही रोज नीट झोपता का? जे लोक रात्री 8 तास झोपतात त्यांचे मानसिक आरोग्य चांगले असते. झोपेच्या कमतरतेचा परिणाम फक्त तुमच्या शरीरावर होत नाही तर मानसिक आरोग्याची हानी होते.त्यामुळे थकवा, चिडचिड आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते. लोक रात्री उशिरापर्यंत मोबाइल किंवा इतर गॅझेटमध्ये व्यस्त असतात ज्यामुळे त्यांना 8 तासांची झोप पूर्ण करता येत नाही. पण, शरीर निरोगी ठेवण्यासाठी चांगल्या दिनचर्येसोबत पुरेशी आणि चांगली झोपही आवश्यक आहे.

फोनचे व्यसन असणे : जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्हाला असे वाटते का की तुम्ही सर्वप्रथम तुमचा फोन तपासावा? स्मार्टफोनचा अतिवापर तुम्हाला नैराश्य, चिंता आणि तणावात टाकतो. फोनचे हे व्यसन संपवण्यासाठी तुम्ही फोनपासून थोडा वेळ काढला पाहिजे. हे सुरुवातीला थोडे कठीण असू शकते. तुम्ही असा काही छंद जोपासला पाहिजे ज्यामुळे तुम्हाला कंटाळा येत नाही आणि तुम्ही काही वेळ मोबाईल स्क्रीनपासून दूर घालवू शकता.

इतरांची मदत न घेणे : तुम्ही इतर सर्वांपेक्षा कार्य चांगले करू शकता असा विचार करून तुम्हाला ग्रुपमध्ये काम करायला आवडत नाही का ? मदत न मागण्याची सवय म्हणजे तुम्ही लोकांकडे दुर्लक्ष करता. जर तुम्ही जीवनात एकटेच संघर्ष करत असाल तर इतर दरवाजे उघडणे सर्वात कठीण असू शकते. हे अशक्य देखील असू शकते कारण तुमच्या समस्या आणि त्याचे उत्तर तुमच्या जवळच्या लोकांमध्ये आहेत. जास्त एकटे राहणे आवडत असेल तर योग्य वेळी मानसिक आरोग्य तज्ञाशी संपर्क साधा आणि छंद जोपासा त्यामध्ये स्वतःला व्यस्त ठेवा.

बांधकाम प्रकल्पांमुळे ठाण्याची हवा प्रदूषित; २८ ठिकाणी नियमभंग, ५.२५ लाखांचा दंड

जाधवजी मॅन्शन बहुमजली इमारतीवर टांगती तलवार; निर्धारित उंचीपेक्षा उभारलेले वरचे मजले पाडावे लागतील, हायकोर्टाचा इशारा

नळाला पाणी नाही, पण बिल वाढले! पहिल्याच महासभेत उल्हासनगरकरांना पाणीपट्टीचा झटका

Mumbai : रुळांवर पाणी भरण्यापासून मुक्तता; पंपिंग स्टेशन उभारणीच्या कामाला वेग; कुर्ला-सायन रेल्वे स्थानकादरम्यान प्रवाशांना दिलासा

तात्पुरत्या स्वरूपात कामावर ठेवलेला चालक 'कर्मचारी'च; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल