Freepik
लाईफस्टाईल

Relationship : नात्यात गोडवा टिकवून ठेवण्यासाठी 'या' छोट्या छोट्या गोष्टी करा

आजच्या काळात नातेसंबंध टिकवून ठेवणे हे एक आव्हान ठरत आहे. मग ते नाते कोणतेही असो. नवरा बायकोचे नाते असो, आई-वडील आणि मुलांचे असो किंवा अन्य नातेवाईकांसोबतचे नाते. काही छोट्या छोट्या गोष्टींकडे दूर्लक्ष केल्यास कोणत्याही नातेसंबंधांत दुरावा निर्माण होऊ शकतो. नातेसंबंधांमधील गोडवा कायम टिकून ठेवण्यासाठी पुढील काही छोट्या-छोट्या गोष्टी करा आणि पाहा आयुष्य आणखी आनंदी होईल.

Kkhushi Niramish

आजच्या काळात नातेसंबंध टिकवून ठेवणे हे एक आव्हान ठरत आहे. मग ते नाते कोणतेही असो. नवरा बायकोचे नाते असो, आई-वडील आणि मुलांचे असो किंवा अन्य नातेवाईकांसोबतचे नाते. काही छोट्या छोट्या गोष्टींकडे दूर्लक्ष केल्यास कोणत्याही नातेसंबंधांत दुरावा निर्माण होऊ शकतो. नातेसंबंधांमधील गोडवा कायम टिकून ठेवण्यासाठी पुढील काही छोट्या-छोट्या गोष्टी करा आणि पाहा आयुष्य आणखी आनंदी होईल.

स्मित हास्य

दैनंदिन जीवनात कार्य करताना आपली नातेवाईकांसोबत कुठे ना कुठे नजरानजर होते किंवा आपण समोरासमोर तरी असतो. अशा वेळी आपल्या चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवा. स्मित हास्य ठेवल्यामुळे समोरची व्यक्ती रागात असली तरी तिचा राग कमी होतो.

काळजी घेणे

कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घेतल्याने नातेसंबंध सुधारतात. यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. काळजी घेण्याचे अनेक प्रकार असतात. कधी प्रेमाचे शब्द बोला, तर कधी त्यांच्या आवडीची एखादी गोष्ट करा. यामुळे तुमच्या चांगल्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचतात.

विचारपूस करणे

घरातील ज्येष्ठ व्यक्तींसोबत बोलताना त्यांची काळजीने विचारपूस केल्यास त्यांना बरे वाटते. यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये जिव्हाळा टिकून राहतो.

एकत्र जेवण करणे

एकत्र जेवण करण्यासारखा आनंद दुसऱ्या कोणत्याच गोष्टीत नसतो. जेव्हा कुटुंब एकत्र जेवण करतो तेव्हा खेळीमेळीचे आनंदाचे वातावरण आपोआपच निर्माण होते. अशा वेळी हास्य विनोद होतात. या सगळ्यांचा परिणाम नातेसंबंधांमध्ये गोडवा टिकून राहतो.

एकमेकांना सन्मान द्या

कोणत्याही नातेसंबंधात सन्मान हा महत्त्वाचा घटक असतो. एकमेकांबद्दल मनात जरी आदराची भावना असली तरी ती छोट्या छोट्या कृतीतून व्यक्त करणे गरजेचे आहे. यातून समोरच्या व्यक्तिला सन्मान दिला जातो. उदाहरणार्थ एखाद्या गोष्टीत ज्येष्ठांचा सल्ला घेणे इत्यादी...

नातेसंबंध टिकवण्यासाठी या काही छोट्या छोट्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. यामुळे प्रेम, आदर, सन्मानाची भावना वाढीस लागते. कौटुंबिक जिव्हाळा वाढतो.

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’