लाईफस्टाईल

सूर्यफुलाच्या बिया : दिसायला लहान पण ताकदवान सुपरफूड

निरोगी आणि संतुलित जीवनशैलीसाठी योग्य आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या दैनंदिन आहारात सहज समाविष्ट करता येणारे, पण पोषणाने परिपूर्ण असे खाद्य म्हणजे सूर्यफुलाच्या बिया. छोट्या आकाराच्या या बियांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि निरोगी चरबीचा साठा असतो.

नेहा जाधव - तांबे

निरोगी आणि संतुलित जीवनशैलीसाठी योग्य आहार घेणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या दैनंदिन आहारात सहज समाविष्ट करता येणारे, पण पोषणाने परिपूर्ण असे खाद्य म्हणजे सूर्यफुलाच्या बिया. छोट्या आकाराच्या या बियांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि निरोगी चरबीचा साठा असतो.

पोषणाने परिपूर्ण बिया

सूर्यफुलाच्या बियांमध्ये प्रथिने, फायबर्स, ओमेगा-३ व ओमेगा-६ फॅटी ॲसिड्स, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे या बिया शरीराला ऊर्जा देण्याबरोबरच अनेक आजारांपासून संरक्षण करतात.

आरोग्यासाठी महत्त्वाचे फायदे

नियमित सेवन केल्यास सूर्यफुलाच्या बिया रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारतात, तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्वचा आणि केसांसाठी हे बियाणे नैसर्गिक टॉनिकसारखे काम करतात. याशिवाय पचनक्रिया सुधारते, रक्तातील साखर संतुलित राहते आणि मानसिक ताण कमी होतो.

दैनंदिन आहारात कसा वापरावा?

सूर्यफुलाच्या बिया नाश्त्यात, हेल्दी स्नॅक्स म्हणून किंवा स्मूदी, सॅलड आणि बेकिंगमध्ये वापरता येतात. मीठ किंवा जास्त मसालेदार प्रकाराऐवजी कच्च्या किंवा हलके भाजलेल्या बिया खाणे अधिक फायदेशीर ठरते.

संतुलित जीवनशैलीसाठी स्मार्ट पर्याय

सूर्यफुलाच्या बिया या छोटेसे पण प्रभावी सुपरफूड आहेत. आहारात त्यांचा समावेश केल्याने केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यही सुधारते. एकूणच, हे बियाणे आपल्या लाईफस्टाईलला निरोगी आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी स्मार्ट पर्याय आहेत.

''तेव्हाच थांबायला हवं होतं''; प्रकाश महाजन यांची मनसेला सोडचिठ्ठी, नाराजीचे कारण समोर

भारत-पाकिस्तान सामना : ''देशभक्तीचा व्यापार सुरू''; उद्धव ठाकरे यांचे भाजपवर टीकास्त्र

"BCCI च्या कुटुंबाचं कोणी मेलं नाही"; भारत-पाक सामन्यावर भडकली पहलगाम हल्ल्यातील पिडीतेची पत्नी; क्रिकेटर, स्पॉन्सर्सना घेतलं धारेवर

रक्त व क्रिकेट एकत्र कसे असू शकते? भारत-पाकिस्तान सामन्यावरून आदित्य यांची टीका

संपूर्ण देशात फटाक्यांवर बंदी हवी; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; स्वच्छ हवा मिळणे हा सर्व नागरिकांचा हक्क