१३ पैकी १२ मागण्या मान्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo-X)
महाराष्ट्र

१३ पैकी १२ मागण्या मान्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठा आंदोलकांनी केलेल्या १३ मागण्यांपैकी 'कायदेशीरदृष्ट्या वैध' असलेल्या १२ मागण्या सरकारने मान्य केल्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नमूद केले.

Swapnil S

मुंबई : मराठा आंदोलकांनी केलेल्या १३ मागण्यांपैकी 'कायदेशीरदृष्ट्या वैध' असलेल्या १२ मागण्या सरकारने मान्य केल्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नमूद केले. तसेच, उर्वरित मागणीबाबतच्या कायदेशीर अडचणींची आणि न्यायालयाच्या आदेशांविरुद्ध गेल्यास मराठा समाजाचे कसे नुकसान होऊ शकते, याची कल्पना सरकारने त्यांना दिली आहे. अशी टोकाची भूमिका घेण्याऐवजी, सणासुदीच्या दिवसांत नागरिकांना त्रास होणार नाही असा निर्णय आंदोलकांनी घ्यावा, असे आवाहन फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक असलेल्या 'गणेशोत्सवा'दरम्यान नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये, अशी सरकारची अपेक्षा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

फडणवीस म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. मुंबईत आंदोलन करण्यासाठी जरांगे यांनी केलेला अर्ज पोलिसांनी फेटाळला होता. नवीन अर्जाबाबत पोलीस त्याच्या गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवात आंदोलनामुळे कोणताही अडथळा येणार नाही अशी सरकारला आशा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबई आणि पुण्यात गणेशोत्सव अत्यंत थाटामाटात साजरा केला जातो. सार्वजनिक स्तरावर साजरा होणारा हा एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI पेमेंटला शुल्क लागू; २००० रु.हून अधिक - ०.४ टक्के शुल्क, २००० पर्यंत - मोफत

दिघीमध्ये जहाजबांधणी; भारतातील सर्वात मोठा प्रकल्प रायगडमध्ये, माझगाव डॉकची २७ हजार कोटींची गुंतवणूक

Maratha Reservation : मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्

निरोगी उद्यासाठी आयुर्वेद