महाराष्ट्र

HSC Exam : ... म्हणून बारावीच्या विद्यार्थ्यांना 'या' पेपरचे मिळणार सहा गुण

चुका मान्य करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्ड विद्यार्थ्यांना 'त्या' तीन प्रश्नांसाठी

वृत्तसंस्था

इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. बारावी बोर्डाच्या परीक्षेत बोर्डाकडून इंग्रजीच्या पेपरमध्ये झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना सहा गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये काही प्रश्नांमध्ये चुका झाल्या होत्या, त्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांना आता सहा गुण मिळणार आहेत. बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये चुका झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर आता बोर्डाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

21 फेब्रुवारीला 12वीचा इंग्रजीचा पहिला पेपर होता. या इंग्रजी पेपरमध्ये कविता विभागातील प्रश्नांमध्ये चुका होत्या. इंग्रजीच्या पेपरमध्ये तीन प्रश्नांमध्ये चुका होत्या. या तीन प्रश्नांसाठी सहा गुण होते. आता बोर्डाने इंग्रजीच्या पेपरमधील चुका मान्य करून विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्ड विद्यार्थ्यांना 'त्या' तीन प्रश्नांसाठी एकूण सहा गुण देईल.

बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमधील तीन चुकीचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सहा गुण देण्यात येणार असल्याचा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला आहे. इंग्रजीच्या पेपरमध्ये चुका आढळून आल्यानंतर बोर्डाने अहवाल देण्यास सांगितले होते. यामध्ये काही तज्ज्ञांची बैठक झाली. बोर्डाने दिलेल्या अहवालात इंग्रजीच्या पेपरमध्ये चुका झाल्याची कबुली बोर्डाने दिली आहे. तीन प्रश्नांमध्ये चुका होत्या.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत