महाराष्ट्र

गुजरातमध्ये वीज पडून १३ जणांचा मृत्यू ३९ जनावरेही मृत

गुजरातमधील २२९ तालुक्यांना रविवारी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अवकाळी पावसाचा तडाखा बसला.

नवशक्ती Web Desk

अहमदाबाद : गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा कहर सुरू असून वीज पडून वेगवेगळ्या घटनांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३९ जनावरेही मृतावस्थेत आढळून आली आहेत. दाहोदमध्ये ३ तर भरूचमध्ये दोघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

अहमदाबाद, साबरकांठा, खेडा, पंचमहल, बोटाड, मेहसाणा, सुरेंद्रनगर आणि अमरोली येथे वीज पडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. अमरोली येथे १६ वर्षीय किशोर याच्यावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. भरूचमध्ये भूरीबेन (५५) आणि त्यांचा मुलगा आकाश कुमार राठोड (१४) हे मासे पकडण्यासाठी नदीवर गेले होते. मात्र वीज पडून दोघांचाही मृत्यू झाला.

आतापर्यंत ३९ जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला असून त्यात खेडा येथे सर्वाधिक १५ जनावरांचा समावेश आहे. गुजरातमधील २२९ तालुक्यांना रविवारी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अवकाळी पावसाचा तडाखा बसला. त्यापैकी ६५ तालुक्यांमध्ये १ ते ४.५ इंच इतका पाऊस झाला. सुरेंद्रनगरमध्ये ४ इंच, सूरत शहरात ३.५ इंच इतका पाऊस पडला.

''तेव्हाच थांबायला हवं होतं''; प्रकाश महाजन यांची मनसेला सोडचिठ्ठी, नाराजीचे कारण समोर

भारत-पाकिस्तान सामना : ''देशभक्तीचा व्यापार सुरू''; उद्धव ठाकरे यांचे भाजपवर टीकास्त्र

"BCCI च्या कुटुंबाचं कोणी मेलं नाही"; भारत-पाक सामन्यावर भडकली पहलगाम हल्ल्यातील पिडीतेची पत्नी; क्रिकेटर, स्पॉन्सर्सना घेतलं धारेवर

रक्त व क्रिकेट एकत्र कसे असू शकते? भारत-पाकिस्तान सामन्यावरून आदित्य यांची टीका

संपूर्ण देशात फटाक्यांवर बंदी हवी; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी; स्वच्छ हवा मिळणे हा सर्व नागरिकांचा हक्क