महाराष्ट्र

गुजरातमध्ये वीज पडून १३ जणांचा मृत्यू ३९ जनावरेही मृत

नवशक्ती Web Desk

अहमदाबाद : गुजरातमध्ये अवकाळी पावसाचा कहर सुरू असून वीज पडून वेगवेगळ्या घटनांमध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३९ जनावरेही मृतावस्थेत आढळून आली आहेत. दाहोदमध्ये ३ तर भरूचमध्ये दोघांचा वीज पडून मृत्यू झाला आहे.

अहमदाबाद, साबरकांठा, खेडा, पंचमहल, बोटाड, मेहसाणा, सुरेंद्रनगर आणि अमरोली येथे वीज पडून प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. अमरोली येथे १६ वर्षीय किशोर याच्यावर वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला. भरूचमध्ये भूरीबेन (५५) आणि त्यांचा मुलगा आकाश कुमार राठोड (१४) हे मासे पकडण्यासाठी नदीवर गेले होते. मात्र वीज पडून दोघांचाही मृत्यू झाला.

आतापर्यंत ३९ जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला असून त्यात खेडा येथे सर्वाधिक १५ जनावरांचा समावेश आहे. गुजरातमधील २२९ तालुक्यांना रविवारी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अवकाळी पावसाचा तडाखा बसला. त्यापैकी ६५ तालुक्यांमध्ये १ ते ४.५ इंच इतका पाऊस झाला. सुरेंद्रनगरमध्ये ४ इंच, सूरत शहरात ३.५ इंच इतका पाऊस पडला.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त