महाराष्ट्र

ताम्हिणी घाटात वऱ्हाडाची बस उलटून ५ ठार, २७ जखमी

रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात वऱ्हाड घेऊन जाणारी एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात शुक्रवारी पाच जण ठार झाले, तर अन्य २७ जण जखमी झाले.

Swapnil S

मुंबई : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात वऱ्हाड घेऊन जाणारी एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात शुक्रवारी पाच जण ठार झाले, तर अन्य २७ जण जखमी झाले.

पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथून वऱ्हाड घेऊन जाणारी ही बस महाडमधील बिरवाडी येथे जात होती. एका वळणावर बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ती उलटली. त्यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिला असे पाच जण ठार झाले, तर अन्य २७ जण जखमी झाले. त्यांना माणगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेत ठार झालेल्यांची नावे संगीता जाधव, गौरव दराडे, शिल्पा पवार आणि वंदना जाधव अशी आहेत, तर पाचव्या मृत प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नाही.

८९ हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना; पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन, २० हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार

देशात उष्णतेचा कहर; वाढत्या तापमानात पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन, पुरेसे पाणी प्या आणि 'या' गोष्टींची काळजी घ्या

Mumbai : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडला युद्धाचा फटका; डिझेलच्या कमतरतेमुळे काम करणे अशक्य, कचरा वाहून नेण्यासाठी होतेय अडचण

Mumbai : मध्य रेल्वेकडून दरवाढीचा प्रस्ताव रद्द; रेल्वे स्टॉलवरील वडा पाव-समोसा जुन्याच किंमतीत मिळणार

Mumbai : लोकलमध्ये दाम्पत्य विसरले १० लाखांच्या दागिन्यांची बॅग; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे ऐवज सापडला