महाराष्ट्र

ताम्हिणी घाटात वऱ्हाडाची बस उलटून ५ ठार, २७ जखमी

रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात वऱ्हाड घेऊन जाणारी एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात शुक्रवारी पाच जण ठार झाले, तर अन्य २७ जण जखमी झाले.

Swapnil S

मुंबई : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात वऱ्हाड घेऊन जाणारी एक खासगी बस उलटून झालेल्या अपघातात शुक्रवारी पाच जण ठार झाले, तर अन्य २७ जण जखमी झाले.

पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथून वऱ्हाड घेऊन जाणारी ही बस महाडमधील बिरवाडी येथे जात होती. एका वळणावर बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ती उलटली. त्यामध्ये दोन पुरुष आणि तीन महिला असे पाच जण ठार झाले, तर अन्य २७ जण जखमी झाले. त्यांना माणगावच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या दुर्घटनेत ठार झालेल्यांची नावे संगीता जाधव, गौरव दराडे, शिल्पा पवार आणि वंदना जाधव अशी आहेत, तर पाचव्या मृत प्रवाशाची ओळख अद्याप पटलेली नाही.

आठवीच्या 'त्या' पुस्तकावर संपूर्ण बंदी! सुप्रीम कोर्टाने NCERT ला घेतले फैलावर; म्हणाले - 'हा सुनियोजित कट, दोषींना सोडणार नाही'

हायवेवर फूड कोर्ट, पेट्रोल पंप किंवा जोडरस्ता हवाय? सर्व NOC आता एकाच क्लिकवर; सुधारित Rajmarg Pravesh पोर्टल लाँच

देशात 'ई-२०' इथेनॉलची विक्री १ एप्रिलपासून बंधनकारक; केंद्र सरकारचा निर्णय

Mumbai : सरकारने थकवले शिक्षण विभागाचे अनुदान; ७२४१.३८ कोटी रुपये मिळविण्यासाठी BMC चा पाठपुरावा सुरूच

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ