महाराष्ट्र

युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा

त्रासाला कंटाळुन जयश्रीने ११ रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास गळफास घेवुन आत्महत्या केली.

Swapnil S

नांदेड : युवतीला लग्नाचे आमिष दाखवून आपले लग्न दुसरीकडेच जमवल्यानंतर त्या युवतीने आत्महत्या केली. याप्रकरणी हिमायतनगर पोलीसांनी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. जयश्री सुभाष जाधव (२०) असे मृताचे नाव आहे. रमनवाडी तांडा येथील सुदाम जाधव यांनी पोलीसात तक्रार दिली आहे. यातील आरोपीने मुलीवर प्रेम करून लग्न करतो, असे वारंवार सांगून दुसरीकडे सोयरीक करून घेवुन वारंवार पिडीत मुलीस त्रास दिल्याने व इतर आरोपीतांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याने त्यांचे त्रासाला कंटाळुन जयश्रीने ११ रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास गळफास घेवुन आत्महत्या केली. तिला आत्महत्या करणेस यातील आरोपीतांनी प्रवृत्त केले.

याप्रकरणी सुदाम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीसांनी पवन उर्फ राजू सुभाष आडे, सुभाष देवला आडे, दिलीप धावजी आडे, सोनु दिलीप आडे अशा चार जणांविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल केला आहे. महिला पोलीस उपनिरिक्षक जाधव या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

महावितरण कंपनीच्या विभाजनावर शिक्कामोर्तब; शेतीच्या वीजपुरवठ्यासाठी स्वतंत्र कंपनी महावितरणचा IPO येणार

आता राज्यभरातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास चार वर्षांचा होणार; विद्यापीठांमध्ये २०२६-२७ पासून 'ऑनर्स' आणि 'संशोधन' पदवीचे नवे पर्याय उपलब्ध

Mumbai : बेस्टला आर्थिक बळाची गरज; महाव्यवस्थापकांचे पालिका आयुक्तांना निवेदन; एकरकमी ४ हजार कोटी देण्याची मागणी

उरण : आदिवासी वाड्यांची पाण्यासाठी वणवण; रानसई-पुनाडे धरणात अवघा ४७% साठा

आंतरजातीय विवाहामुळे जैन कुटुंबावर सामाजिक बहिष्कार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार