(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

सांगलीच्या जागेवरून शिवसेना-काँग्रेसमध्ये वाद; उद्धव ठाकरेंच्या सभेवर स्थानिक आमदाराचा बहिष्काराचा इशारा

महाविकास आघाडी एकत्र असल्याने आम्ही सांगलीची निवडणूक लढवू. मी शरद पवारांशी बोललो आहे. आम्ही राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंडमध्ये जागा मागत नाही. एक प्रादेशिक पक्ष स्वतःच्या राज्यात जागा मागणार आहे, अशी पुष्टी यावेळी संजय राऊत यांनी जोडली.

Swapnil S

मुंबई : सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या सभेवर बहिष्कार टाकल्याची घोषणा केल्याने तणाव निर्माण झाला.

उद्धव ठाकरे हे सांगलीत जाहीर सभेला जाणार असून त्यांनी काँग्रेससह त्यांच्या महाविकास आघाडीच्या सहकारी पक्षांनाही सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. शिवसेनेने (उबाठा) कुस्तीपटू चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी देण्याचे संकेत दिले असताना, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नाना पटोले यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला आपला पक्ष विशाल पाटील यांना उमेदवारी देणार असल्याचे सांगितले.

सांगलीची जागा नेहमीच काँग्रेसकडे राहिली आहे. ही जागा काँग्रेसला मिळावी, असे आमचे मत आहे आणि आम्ही ते आमच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचविले आहे. शिवसेनेने एकतर्फी उमेदवार जाहीर केल्याने आम्ही या रॅलीला येणार नाही, असे जत मतदारसंघाचे आमदार सावंत म्हणाले.

या विषयावर बोलताना शिवसेनेचे (उबाठा) नेते संजय राऊत यांनी सांगितले की, त्यांनी कोल्हापूरची जागा काँग्रेसला दिली आहे. महाविकास आघाडी एकत्र असल्याने आम्ही सांगलीची निवडणूक लढवू. मी शरद पवारांशी बोललो आहे. आम्ही राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंडमध्ये जागा मागत नाही. एक प्रादेशिक पक्ष स्वतःच्या राज्यात जागा मागणार आहे, अशी पुष्टी यावेळी राऊत यांनी जोडली.

ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर हल्ला; १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

व्हिडीओ एडिटिंग येत नाही? फक्त काही टॅप्समध्ये साधा व्हिडीओ होईल सिनेमॅटिक; Google Photos चं नवं एआय फीचर लॉन्च

Palghar Landslide : तांदुळवाडी किल्ल्याजवळ दरड कोसळली; पर्यटकांसाठी प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Mumbai : 'मराठीत बोला' म्हणणाऱ्या प्रवाशाला दोन तास RPF कार्यालयात बसवून ठेवले; व्हायरल VIDEO ची रेल्वेकडून चौकशी

Nandurbar : शासकीय वसतिगृहात अन्नातून विषबाधा? ४० विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली; अन्नाचे नमुने तपासणीसाठी