संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

बहिणीचे प्रेम विकले जाणारे नाही; सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

Swapnil S

मुंबई : विधानसभा निवडणूक ही यश - अपयशाची लढाई नाही, तर तत्त्वांची लढाई आहे. पंधराशे रुपयात विकले जाईल असे बहिणीचे प्रेम नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावला.

लोकसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाने आपल्याला खूपच मदत केली, त्यामुळे या दोन्ही पक्षांचे आपण आभार मानतो, असेही त्या म्हणाल्या.

दिल्लीतील वातावरण बदलले, तसे महाराष्ट्रातील वातावरणही आता बदलणे गरजेचे आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट कोणालाही द्या, मात्र विजय मविआचाच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

सुळे म्हणाल्या की, भाजपचे आमदार रवी राणा यांनी, विधानसभा निवडणुकीत मतदान केले नाही तर बहिणीकडून पैसे परत घेण्याचे वक्तव्य केले. त्यांच्या मनातीलच ओठावर आले आहे. राज्यात सध्या गलिच्छ राजकारण सुरू असून भ्रष्ट महायुती सरकारला तिची योग्य ती जागा दाखवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांने महाविकास आघाडी म्हणजे आपलेचच सरकार हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीच्या कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी उपस्थित काऱ्यकर्त्यांना केले.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला