महाराष्ट्र

मलकापूरात लक्झरी बसचा भीषण अपघात; 6 जण ठार तर २५ गंभीर जखमी

अरनाथहून हिंगोली जाणाऱ्या लक्झरी बसला एका दुसऱ्या भरधाव येणाऱ्या लक्झरी बसने समोरुन जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

नवशक्ती Web Desk

अरनाथहून हिंगोली जाणाऱ्या लक्झरी बसला एका दुसऱ्या भरधाव येणाऱ्या लक्झरी बसने समोरुन जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. यात अतीगंभीर जखमी झालेल्या पाच रुग्णांना बुलढाणा येथे हलवण्यात आलं आहे. मात्र, त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ६ वर मलकापूर नजीकच्या लक्ष्मी नगरातील रेल्वे उड्डाण पुलावर आज शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

हिंगोलीतील ट्रॅव्हल्स कंपनीची लक्झरी बस अमरनाथहून ४० प्रवाशांना घेऊन हिंगोलीकडे परत जात होती. आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास नागपूरवरुन नाशिककडे जात असलेल्या बसने हिंगोली जाणाऱ्या बसला समोरुन धडकी दिली.

या अपघातात हिंगोलीला परत असलेल्या बस मधील पाच प्रवासी हे जागीच ठार झाले. तर २५ जण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं. यामुळे महामार्गावर काही काळ चक्का जाम झाला होता.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल