महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर अपघात 'या' कारणाने होत आहेत, संजय राऊतांचा खुलासा

नागपूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा येथे अपघात

नवशक्ती Web Desk

बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. नागपूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा येथे हा अपघात झाला. यावर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “ समृद्धी महामार्गाला अनेकांनी शाप दिल्याने हा शापित महामार्ग झाला आहे, असे संजय राऊत यांनी व्यक्त केले. शनिवारी (आज) ते मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

ते म्हणाले की, "समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग बनला आहे. तो शापित का झाला ? याच्या खोलात जावे लागेल. तो महामार्ग करण्यासाठी सरकारने मनमानी कारभार केला. याबाबत अनेक गोष्टी आहेत. त्या भविष्यात समोर येतील, पण दुर्दैवाने त्या रस्त्यांवर वारंवार अपघात होतात, वारंवार मृत्यू होतात. हे चांगले नाही. “कितीवेळा श्रद्धांजली वाहायची. आम्ही अनेकदा समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेची मागणी केली. त्यावर काहीच होत नाही. भ्रष्टाचारातून तो रस्ता तयार झाला आहे. त्या रस्त्यासाठी अनेकांच्या जमिनी हडपल्या गेल्या. जबरदस्तीने जमिनी घेतल्या गेल्या.

आजचे राशिभविष्य, २४ एप्रिल २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

दिवसभर AC मध्ये राहिल्यामुळे त्वचा कोरडी आणि निस्तेज झालीये? ग्लो वाढवण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

Home Gardening Tips : उन्हाळ्यात कोरफड पिवळी पडतेय? फॉलो करा 'या' ५ सोप्या टिप्स, रोप राहील नेहमी हिरवेगार!

उन्हाळ्यात लिची खाण्याचे आरोग्यदायी फायदे; प्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच त्वचेसाठीही वरदान!

सरकारचे तंत्रकठोर नियम! एआयसाठी ‘कायमस्वरूपी’ लेबल; ऑनलाइन गेमिंगसाठीही नवीन नियमावली जाहीर