महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर अपघात 'या' कारणाने होत आहेत, संजय राऊतांचा खुलासा

नागपूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा येथे अपघात

नवशक्ती Web Desk

बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. नागपूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा येथे हा अपघात झाला. यावर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “ समृद्धी महामार्गाला अनेकांनी शाप दिल्याने हा शापित महामार्ग झाला आहे, असे संजय राऊत यांनी व्यक्त केले. शनिवारी (आज) ते मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.

ते म्हणाले की, "समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग बनला आहे. तो शापित का झाला ? याच्या खोलात जावे लागेल. तो महामार्ग करण्यासाठी सरकारने मनमानी कारभार केला. याबाबत अनेक गोष्टी आहेत. त्या भविष्यात समोर येतील, पण दुर्दैवाने त्या रस्त्यांवर वारंवार अपघात होतात, वारंवार मृत्यू होतात. हे चांगले नाही. “कितीवेळा श्रद्धांजली वाहायची. आम्ही अनेकदा समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेची मागणी केली. त्यावर काहीच होत नाही. भ्रष्टाचारातून तो रस्ता तयार झाला आहे. त्या रस्त्यासाठी अनेकांच्या जमिनी हडपल्या गेल्या. जबरदस्तीने जमिनी घेतल्या गेल्या.

"पहिली अन् शेवटची चूक"; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणाऱ्या मुलीने मागितली माफी, म्हणाली - "मी फक्त १५...

"फक्त रीलमध्ये माफ करणार की गुन्हेही मागे घेणार?"; पंतप्रधान मोदींच्या व्हिडिओवर अभिजीत दिपकेंचा सवाल

मुंबई-सावंतवाडी प्रवाशांना दिलासा! नव्या दैनंदिन एक्सप्रेसला मंजुरी; 'या' स्थानकांवर थांबणार

आजपासून बदलले अनेक महत्त्वाचे नियम! LPG सिलिंडरपासून रेल्वे तिकीट, बँकिंगपर्यंत जाणून घ्या नवे अपडेट्स

Mumbai : स्टेशन मास्तरांवर आणखी एक जबाबदारी! आता भटक्या कुत्र्यांवरही ठेवावी लागणार नजर