शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीकडून झालेल्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झालेले दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी राऊत कुटुंबीयांची भेट देखील घेतली. यानंतर पत्रकार परिषद घेत भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला. तसेच भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना खडे बोल सुनावले.
पत्रकार परिषदेमध्ये काय मुद्दे मांडले ?
- संजय राऊत यांचा मला नक्कीच अभिमान
- संजय राऊत शरण जाऊ शकले असते, पण ते गेले नाहीत कारण ते हाडाचे शिवसैनिक आहेत.
- सध्याच्या सरकारने चेहऱ्यावर फेस लावला आहे, तो फेस गेला की, त्यांना परिस्थितीची जाणीव होईल.
- लोकांनी डोळे उघडे ठेवून सर्व पाहिलं पाहिजे की, देशाची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे.