अजित पवार, एकनाथ शिंदे  
महाराष्ट्र

पुण्यात युतीबाबत अजित पवार-शिवसेनेचे संकेत; महायुतीतील पेच सोडवण्यासाठी हालचाली

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत निवडणूकपूर्व युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

Swapnil S

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत निवडणूकपूर्व युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या दोन्ही महानगरपालिकांमध्ये मतांचे विभाजन टाळण्यासाठी शिवसेनेसोबत युती आवश्यक असल्याचे त्यांनी सूचित केले आहे.

यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांनी आधीच पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये निवडणूकपूर्व युती केली असून, आता या आघाडीत शिंदे गटाच्या शिवसेनेला सामावून घेण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, पुणे व पिंपरी-चिंचवडमधील राजकीय परिस्थिती पाहता भारतीय जनता पक्षाने सर्व १६५ जागांवर स्वबळावर उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शवली आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये शिवसेनेसोबत युती करण्याचे आश्वासन दिले असतानाही, भाजपने या दोन शहरांमध्ये शिवसेनेसाठी जागा सोडण्यास नकार दिल्याचे चित्र आहे. भाजपने केवळ १५ जागांची ऑफर दिल्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत सुमारे १४० हून अधिक उमेदवारी अर्ज (एबी फॉर्म) भरल्याची माहिती आहे

या पार्श्वभूमीवर महायुतीतील निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेतला असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी जागावाटपाचा तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, २०१२ ते २०१७ या कालावधीत भाजप या दोन्ही महापालिकांमध्ये सत्तेत होती, तर राष्ट्रवादी काँग्रेस मुख्य विरोधी पक्षाच्या भूमिकेत होती. त्या काळात शिवसेनेला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता.

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती

LPG ग्राहकांनो लक्ष द्या! e-KYC अनिवार्य; मोबाईलवर काही मिनिटांत पूर्ण करा ही प्रक्रिया