मोठी बातमी! विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू 
महाराष्ट्र

मोठी बातमी! विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (दि.२८) सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला. अजित दादांच्या अकाली एक्झिटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच शोककळा पसरली आहे.

Krantee V. Kale

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज (दि.२८) सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, सकाळी ८.४५ च्या सुमारास बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करतेवेळी ही विमान दुर्घटना घडली. अजित दादांच्या अकाली एक्झिटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच शोककळा पसरली आहे.

विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू

माहितीनुसार, जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या चार सभा होणार होत्या. त्यासाठी ते सकाळी एका खासगी चार्टर्ड विमानाने मुंबईहून बारामती विमानतळावर पोहोचले होते. अपघात इतका भीषण होता की यात विमानातील सर्वजण मृत्यूमुखी पडल्याचे सांगण्यात येत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या अपघातात विमानातील सर्व पाच जणांच्या मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्यासोबत विमानात त्यांचे खासगी सुरक्षा अधिकारी एचसी विदिप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?

प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, विमान धावपट्टीवर उतरत असतानाच ही दुर्घटना घडली. बारामती विमानतळाशेजारी दुकान असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने 'द इंडियन एक्सप्रेस'ला सांगितले की, “विमान उतरत असताना खूप आवाज करत होते, त्यामुळे माझे लक्ष तिकडे गेले. ते उतरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले, पण ते धावपट्टीवरून घसरले आणि मोठा स्फोट झाला. त्यांनी विमानातून चार ते पाच मृतदेह बाहेर काढले.”

या दुर्घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात तीव्र शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह सर्व पक्षांच्या नेत्यांकडून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत. कुटुंबीय आणि निकटवर्तीय बारामतीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. अपघातस्थळाचे व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.

(बातमी अपडेट होत आहे)

वर्गात मोबाईलला बंदी! जगातील निम्म्याहून अधिक देशांनी घेतला मोठा निर्णय; UNESCO अहवालातून उघड

मुंबईत वॉटर मेट्रो येणार? कल्याण-गेटवे ३४० किमी मार्ग; पहिला टप्पा डिसेंबर २०२६ पर्यंत सुरू होण्याची शक्यता

Iran vs US-Israel War : डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा; "४८ तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा, नाहीतर....

पाळीव मांजर ठेवण्यास कुटुंबीयांचा विरोध; २३ वर्षीय डॉक्टर तरुणीची आत्महत्या

प्रेमविवाहाचा दुर्दैवी अंत! हुंड्यासाठी पतीकडून पत्नीची हत्या; अवघ्या ४ महिन्यांत संसार उद्ध्वस्त