महाराष्ट्र

अमित शहांनी घेतली दखल, मुख्यमंत्री शिंदेंशी केली चर्चा

लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने उपचार करणे हे आमचे प्राधान्य आहे

नवशक्ती Web Desk

रायगडमधील इर्शाळवाडीत दरड कोसळून झालेल्या भीषण घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, या घटनेची माहिती जाणून घेतानाच सर्व पातळ्यांवर सहकार्य करण्याची भूमिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतली आहे. या संदर्भात शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. अमित शहा म्हणाले की, “महाराष्ट्रातील रायगड येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या भूस्खलनाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले आहे. एनडीआरएफच्या ४ टीम घटनास्थळी पोहोचल्या असून, स्थानिक प्रशासनासह बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढणे आणि जखमींवर तातडीने उपचार करणे हे आमचे प्राधान्य आहे.”

दिल्लीनंतर आता मुंबईत उभारणार 'बिहार भवन'; जागा ठरली, ३० मजली इमारतीसाठी ३१४ कोटीही मंजूर

Kalyan : देशातील सर्वात लांब फ्युनिक्युलर रेल्वे सुरू; मलंगगडाची २ तासांची चढाई अवघ्या १० मिनिटांत, पहिले दोन दिवस मोफत प्रवास

महापालिका निवडणुकांत ‘नोटा’ चा राजकीय इशारा! ठाणेकरांमध्ये असंतोष; उल्हासनगरमध्ये नाराजीचा स्फोट

स्पेनमध्ये भीषण रेल्वे अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेन एकमेकांना धडकल्या; २१ जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Mumbai : ‘हॅलो!!! हॅलो!!! माईक चेक, माईक चेक’; BMC नगरसेवकांच्या स्वागतासाठी सज्ज; साडेतीन वर्षांनंतर होणार कामकाज