अंजली दमानिया, धनंजय मुंडे (डावीकडून) 
महाराष्ट्र

मुंडे यांनी शासकीय बंगला सोडलाच पाहिजे; ४६ लाखांचे थकीत भाडे भरावे, अंजली दमानिया यांची मागणी

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी मुंबईतील आपला शासकीय बंगला ४८ तासांत रिकामा करावा. तसेच त्यांनी त्या बंगल्याच्या वापरासाठी सरकारकडे ४६ लाख रुपये थकवले आहेत, ते बील भरावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी केली.

Swapnil S

मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी मुंबईतील आपला शासकीय बंगला ४८ तासांत रिकामा करावा. तसेच त्यांनी त्या बंगल्याच्या वापरासाठी सरकारकडे ४६ लाख रुपये थकवले आहेत, ते बील भरावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बुधवारी केली.

मुंडे यांनी 'सातपुडा' नावाचा बंगला रिकामा केला नाही आणि थकीत ४६ लाख रुपये भरले नाहीत, तर राज्य सरकारला कायदेशीर नोटीस पाठवू, असा इशारा दमानिया यांनी दिला आहे.

मुंडे यांच्या २०२४ च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात गिरगाव चौपाटी परिसरातील 'विरभवन' इमारतीत एक २,१५१ चौरस फूटाचे फ्लॅट असल्याचा उल्लेख आहे, जो सध्या वापरात नाही. त्यामुळे त्यांचे शासकीय बंगला वापरणे चुकीचे आहे, असे दमानिया यांनी सांगितले.

...तर आंदोलन करणार

मुंडे यांनी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री पदाचा राजीनामा सुमारे पाच महिन्यांपूर्वी दिला होता, पण त्यांनी अजूनही शासकीय निवासस्थान रिकामे केलेले नाही. मुंडे यांनी ४८ तासांत बंगला रिकामा केला नाही, तर थकीत भाडे वसुली तसेच मुंडे यांच्या हकालपट्टीसाठी आपण आंदोलन करू, असे दमानिया यांनी सांगितले.

‘फोडा आणि राज्य करा’ हीच संस्कृती

आजचे राशिभविष्य, १८ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

"२० जुलैपर्यंत जिवंत राहीन, नाहीतर भूत बनून परत येईन"; सोनम वांगचुक उपोषणावर ठाम

कल्याण-सीएसएमटी लोकलमध्ये डोंबिवलीहून 'डाउन' प्रवासामुळे राडा; महिलेने थेट पेपर स्प्रे फवारला

Mumbai : प्रस्तावित 'रेल्वे टर्मिनस' लटकले; रेल्वे, संरक्षण मंत्रालयात जमिनीचा वाद