महाराष्ट्र

अण्णा हजारेंनी देशाचे वाटोळे केले -आव्हाड

प्रतिनिधी

मुंबई : “अण्णा हजारे या माणसाने संपूर्ण देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणून कुणी गांधी होत नाही,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. या आरोपाने पद्मभूषण अण्णा हजारे दुखावले आहेत. मी देशाचे वाटोळे कसे केले, याचा खुलासा जितेंद्र आव्हाडांनी करावा, असे म्हणत अण्णा हजारे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

“याविषयी आपण कायदेशीर सल्ला घेत आहोत. तसेच हा दावा कुठून आणि कशा पद्धतीने दाखल करायचा, हे आपण लवकरच जाहीर करणार आहोत,” असे अण्णा हजारे यांनी सांगितले आहे. आव्हाडांनी आता अण्णा हजारे यांच्याशी नवा वाद छेडला आहे. या निमित्ताने दीर्घकाळ प्रसिद्धी झोतात नसलले हजारे या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत.

दिल्ली पोलिसांकडून न्यूजक्लिक या ऑनलाइन पोर्टलवर तसेच पत्रकारांवर सुरू असलेल्या धाडसत्राचा निषेध नोंदवण्यासाठी मुंबईत प्रेस क्लब येथे गुरुवारी संध्याकाळी कँडल मार्च काढण्यात आला. त्यात मुंबईसह राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने भाग घेत सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त