महाराष्ट्र

अण्णा हजारेंनी देशाचे वाटोळे केले -आव्हाड

“अण्णा हजारे या माणसाने संपूर्ण देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणून कुणी गांधी होत नाही,” असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्रआव्हाड यांनी केला आहे.

प्रतिनिधी

मुंबई : “अण्णा हजारे या माणसाने संपूर्ण देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणून कुणी गांधी होत नाही,” असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. या आरोपाने पद्मभूषण अण्णा हजारे दुखावले आहेत. मी देशाचे वाटोळे कसे केले, याचा खुलासा जितेंद्र आव्हाडांनी करावा, असे म्हणत अण्णा हजारे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

“याविषयी आपण कायदेशीर सल्ला घेत आहोत. तसेच हा दावा कुठून आणि कशा पद्धतीने दाखल करायचा, हे आपण लवकरच जाहीर करणार आहोत,” असे अण्णा हजारे यांनी सांगितले आहे. आव्हाडांनी आता अण्णा हजारे यांच्याशी नवा वाद छेडला आहे. या निमित्ताने दीर्घकाळ प्रसिद्धी झोतात नसलले हजारे या प्रकरणामुळे चर्चेत आले आहेत.

दिल्ली पोलिसांकडून न्यूजक्लिक या ऑनलाइन पोर्टलवर तसेच पत्रकारांवर सुरू असलेल्या धाडसत्राचा निषेध नोंदवण्यासाठी मुंबईत प्रेस क्लब येथे गुरुवारी संध्याकाळी कँडल मार्च काढण्यात आला. त्यात मुंबईसह राज्यातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने भाग घेत सरकारच्या भूमिकेचा निषेध केला.

Bihar Election Results 2025 Live Updates: एनडीए २०० च्या पार; "ही ज्ञानेश कुमार यांची जादू"; काँग्रेसच्या भूपेश बघेल यांची टीका

Assembly Bypolls Result 2025 : अंतापाठोपाठ जुबली हिल्समध्येही काँग्रेसचा दमदार विजय; बघा अन्य ६ जागांवर कोणाची बाजी?

सुवर्णकाळ गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे निधन; ९८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Red Fort Blast : दिल्ली बॉम्बस्फोटप्रकरणी मोठी कारवाई; मास्टरमाईंडचे घर सुरक्षा दलाने उडवले

CSMT : लाल बॅगेचं गूढ उलगडलं! कोणताही धोका नाही, बॅगेत आढळल्या 'या' वस्तू