महाराष्ट्र

समीर वानखेडे यांची अटक टळली; हायकोर्टाकडून तात्पुरता दिलासा

नवशक्ती Web Desk

आर्यन खान क्रूझ ड्र्ग्ज प्रकरण देशभर गाजले होते. यानंतर आता या प्रकरणाला वेगळे वळण लागेल आहे. आर्यन खान याला सोडण्यासाठी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडे 25 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. सीबीआयकडून समीर वानखेडे यांची याप्रकरणी चौकशी सुरु आहे. सीबीआयने या प्रकरणी वानखेडे यांना अटक केली होती, सीबीआयच्या अटकेविरोधात वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. हायकोर्टाने समीर वानखेडे यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा दिला आहे.

समीर वानखेडे यांनी सीबीआयच्या अटकेविरोधात मुंबई उच्चन्यायालयात रीट पिटीशन दाखल केली होती. यावर न्यायालयाने त्यांना अटकेपासून तात्पूरते संरक्षण देत 22 मे पर्यंत अटक न करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. समीर वानखेडे हे सीबीआयच्या चौकशीला सामोरे जातील. वानखेडे तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप सीबीआयने त्यांच्यावर केला होता. यावर कोर्टाने त्यांना तपासात सहकार्य करण्यास सांगितले आहे. या प्रकरणावर सोमवारी सुनावणी पार पडणार आहे. त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त