एक्स @MeNarayanRane
महाराष्ट्र

साहेबांनी ४६ वर्षात जे मिळवले, ते उद्धवनी अडीच वर्षांत गमावले - नारायण राणे

साहेबांनी ४६ वर्षात जे मिळवले, ते उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत गमावले, असा टोला भाजपचे नेते नारायण राणे यांनी शिर्डीमध्ये माध्यमांशी बोलताना लगावला.

Swapnil S

अहिल्यानगर : साहेबांनी ४६ वर्षात जे मिळवले, ते उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षांत गमावले, असा टोला भाजपचे नेते नारायण राणे यांनी शिर्डीमध्ये माध्यमांशी बोलताना लगावला.

राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे आधी दोन्ही हात वर करून बोलत असायचे. मात्र, आता ते हात एकदम छोटे झाले. त्यामुळे उद्या स्वबळावर लढून काय होणार? स्वबळाची ताकद त्यांची राहिली नाही. तर संजय राऊत यांची मानसिकता चांगली नाही. ते सध्या डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. तुम्हीही देऊ नका, असे ते म्हणाले.

शिवसेनेची सत्ता असताना संजय राऊत कोणाकोणाला पोसत होते? कोणकोणत्या माफियांना संजय राऊत भेटत होते? कोणती तीर्थयात्रा केली म्हणून त्यांना जेलचा पुरस्कार मिळाला होता? हे त्यांना आधी सांगावे. शिवसेनेत बोलायला माणूस नसल्यामुळे व राऊतांना कामधंदा नसल्याने ते असे बोलतात, अशी टीका राणे यांनी केली.

पक्षाचे नेते घेतील तो निर्णय मान्य

भाजपच्या ठाकरे गटाशी वाढलेल्या जवळकीवर बोलताना नारायण राणे म्हणाले की, मला बरं वाटतंय, वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. तो जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य राहील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती स्वबळावर लढणार की नाही हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही. ते आता सांगता येणार नाही.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

Maratha Reservation Protest : सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान भरपाईचे काय? उच्च न्यायालयाचा मराठा आयोजकांना सवाल

Mumbai : २३८ एसी लोकल खरेदीला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४८२६ कोटींची मान्यता

कोकणातून परतणाऱ्या गणेशभक्तांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर ३ किमीपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा