महाराष्ट्र

भाऊराव साखर कारखान्याकडे बँकाचे २६५ कोटी रुपयांचे कर्ज

दोन कारखाने विकून आलेले पैसे गेले कुठे? इंगोले यांचा सवाल

प्रतिनिधी

नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याकडे बँकांचे २६५ कोटी रुपये कर्ज असल्याची बाब उघड झाली आहे. बँकेच्या कर्जाशिवाय कारखान्याकडे शेतकऱ्यांच्या ऊस एफआरपीचे १०४ कोटी रुपये अद्याप देणे बाकी असल्याची माहिती उसदर नियंत्रण मंडळाचे माजी सदस्य तथा शिवसेना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी देऊन हुतात्मा व शंकर वाघलवाडा हे कारखाने विकून आलेले पैसे कुठे गेले, असा सवाल उपस्थित केला.

आमच्याकडे बक्षीस ठेवायला जागा कमी पडत आहे, जिल्ह्यात आमच्याच साहेबांनी सहकार कसा जिवंत ठेवला? अशी शेखी मिरवणाऱ्यांना कारखान्याचे आर्थिक वास्तव कळल्याने पळताभुई होत आहे. कारखान्याचे भागभांडवल वाढवण्यासाठी शेअर्स धारकांना कर्ज द्यावे, त्यासाठी कारखाना हमी घेईल, अशा स्वरूपाची मागणी करताना सादर केलेल्या कारखान्याच्या आर्थिक विवरण पत्रात विविध बँकांचे कारखान्याकडे २६५ कोटी रुपये कर्ज असल्याची बाब समोर आली. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली.

कारखान्याच्या सभासदांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केवळ बघ्याची भूमिका न घेता ऊस एफआरपीचे थकीत पैसे कधी देणार? भाऊरावचे दोन युनिट विकून आलेली रक्कम कुठे गेली? याचा जाब कारखान्याच्या मुख्य प्रवर्तकासह चेअरमन व संचालक मंडळाला विचारून वेळप्रसंगी रस्त्यावर येण्याची तयारी ही शेतकऱ्यांनी ठेवावी, असे आवाहन प्रल्हाद इंगोले यांनी केले.

पालिका निवडणुकांचे बिगुल वाजले! २९ महापालिकांचा महासंग्राम १५ जानेवारीला, १६ जानेवारीला मतमोजणी; आचारसंहिता लागू

पुण्यात भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

महालक्ष्मी रेसकोर्सवर होणार सेंट्रल पार्क; आचारसंहिता लागू होण्याआधीच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून घोषणांचा पाऊस

म्हाडा वसाहतींच्या सामूहिक पुनर्विकासाला गती; २० एकरवरील प्रकल्पांसाठी नवीन धोरण जाहीर

केंद्राच्या ‘मनरेगा’तून महात्मा गांधी बाहेर; आता योजनेचे नवे नाव ‘विकसित भारत-जी- राम-जी २०२५’