महाराष्ट्र

ज्या ठिकाणी जन्म, त्याच ठिकाणचे प्रमाणपत्र; कार्यपद्धती बंधनकारक करण्याचा महसूल विभागाचा निर्णय 

एखाद्याचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणचे प्रमाणपत्र ही कार्यपद्धती आता बंधनकारक करण्यात आली आहे.‌

Swapnil S

मुंबई : एखाद्याचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणचे प्रमाणपत्र ही कार्यपद्धती आता बंधनकारक करण्यात आली आहे.‌ यामुळे बेकायदा प्रमाणपत्र घेऊन बेकायदा घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी व रोहिंग्यांना आळा बसणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे.

ज्यांचा जन्म अथवा मृत्यू होऊन एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असेल व त्यांच्या संबंधितांना ही प्रमाणपत्रे पाहिजे असतील आणि त्याबाबतचे सबळ पुरावे नसतील अशा अर्जदारांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.

जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम, २०००  नुसार एका वर्षापेक्षा जास्त विलंबाच्या जन्म-मृत्यू नोंदी घेण्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली. ज्या ठिकाणी जन्म झाला, त्या ठिकाणच्या नोंदी तपासून प्रमाणपत्र दिले जाईल. त्यासाठी ग्रामसेवक, जन्म मृत्यू निबंधक, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी कोणत्या पद्धतीने कामकाज करावे, ही सांगणारी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

गुजरातच्या सत्तेत मोठा फेरबदल; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल वगळता संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा, उद्या नवे मंत्री शपथ घेणार

Mumbai : पूजा खेडकरच्या वडिलांना न्यायालयाचा दिलासा, ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

Canada News : कपिल शर्माच्या ‘कॅप्स कॅफे’वर पुन्हा गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! रशियात नोकरीचं आमिष दाखवून युक्रेनसोबतच्या युद्धात लढायला पाठवलं; "माझ्या पतीला भारतात परत आणा" - पत्नीची याचना

जिंकलंस भावा! कर्जतच्या तरुणाने मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर केली महिलेची प्रसूती; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून वाचवले दोन जीव