महाराष्ट्र

ज्या ठिकाणी जन्म, त्याच ठिकाणचे प्रमाणपत्र; कार्यपद्धती बंधनकारक करण्याचा महसूल विभागाचा निर्णय 

एखाद्याचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणचे प्रमाणपत्र ही कार्यपद्धती आता बंधनकारक करण्यात आली आहे.‌

Swapnil S

मुंबई : एखाद्याचा जन्म ज्या ठिकाणी झाला त्याच ठिकाणचे प्रमाणपत्र ही कार्यपद्धती आता बंधनकारक करण्यात आली आहे.‌ यामुळे बेकायदा प्रमाणपत्र घेऊन बेकायदा घुसखोरी करणाऱ्या बांगलादेशी व रोहिंग्यांना आळा बसणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे.

ज्यांचा जन्म अथवा मृत्यू होऊन एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असेल व त्यांच्या संबंधितांना ही प्रमाणपत्रे पाहिजे असतील आणि त्याबाबतचे सबळ पुरावे नसतील अशा अर्जदारांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करणार असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.

जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ मधील तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम, २०००  नुसार एका वर्षापेक्षा जास्त विलंबाच्या जन्म-मृत्यू नोंदी घेण्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली. ज्या ठिकाणी जन्म झाला, त्या ठिकाणच्या नोंदी तपासून प्रमाणपत्र दिले जाईल. त्यासाठी ग्रामसेवक, जन्म मृत्यू निबंधक, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी कोणत्या पद्धतीने कामकाज करावे, ही सांगणारी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.

Pune Rain : उकाड्याने हैराण पुणेकरांना पावसाचा दिलासा! शहरातील अनेक भागांत बरसल्या सरी

NEET UG 2026 Re-Exam : उशिरा पोहोचल्याने दोन विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारला; गेट बंद होताच गोंधळ

BEST संपामुळे महामुंबई मेट्रोचा नवा विक्रम; एका दिवसात ३ लाख ५७ हजारांहून अधिक प्रवाशांचा प्रवास

Mumbai : 'एलटीटी'त ५६ तासांचा विशेष ट्रॅफिक ब्लॉक; अनेक एक्स्प्रेस गाड्यांवर होणार परिणाम

"माझ्या मृत्यूसाठी कोणीही जबाबदार नाही..."; हैदराबादमध्ये NEET पुनर्परीक्षेआधीच टोकाचं पाऊल, १९ वर्षीय विद्यार्थिनीने संपवलं जीवन