महाराष्ट्र

‘लाडकी बहीण’ सर्वात भारी…!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून ६०० निर्णयाची चर्चाच नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिश्किल हसतच विरोधकांना टोला लगावला.

Swapnil S

मुंबई : गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या हिताचे ६०० हून अधिक निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले गेले. मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून ६०० निर्णयाची चर्चाच नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिश्किल हसतच विरोधकांना टोला लगावला.

शांतीब्रह्म ह.भ.प. मारोती महाराज कुरेकर बाबा यांच्या ९३ व्या अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी तसेच वारकरी पूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी आळंदी दौऱ्यावर आहे. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

माझ्या आयुष्यातील आजचा कार्यक्रम हा सर्वात आगळावेगळा आहे. वारकऱ्यांमध्ये येणे हे मी माझे भाग्य समजतो. त्याहून दुसरे पुण्य काहीच नाही. खरे म्हणजे आम्ही मुख्यमंत्री असलो किंवा सरकारमध्ये असलो तरी राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचे स्थान नक्कीच मोठे आहे. राजकीय मंडळीही आपल्यासमोर नतमस्तक होतात. कारण वारकरी एक अशी फॅक्ट्री आहे जिथे समाज तयार केला जातो. म्हणूनच आनंद दिघे नेहमी वारकरी संप्रदाय समूहात मला घेऊन यायचे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पाकिस्तानात सलमान खान 'दहशतवादी' घोषित; एका विधानाने 'भाईजान' ठरला अतिरेकी

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; निलंबित PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण

झारखंड : रुग्णालयाचा निष्काळजीपणा? थॅलेसेमियाग्रस्त ५ मुलांना HIV ची लागण; दूषित रक्त चढवल्याचा धक्कादायक आरोप

Karad : खड्ड्यांमध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन; रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन

कळवा रुग्णालयात गर्भवतींची गैरसोय; २५ बेड क्षमता असताना ३२ महिला दाखल; ८ प्रतीक्षेत