महाराष्ट्र

‘लाडकी बहीण’ सर्वात भारी…!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून ६०० निर्णयाची चर्चाच नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिश्किल हसतच विरोधकांना टोला लगावला.

Swapnil S

मुंबई : गेल्या अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या हिताचे ६०० हून अधिक निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले गेले. मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासून ६०० निर्णयाची चर्चाच नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिश्किल हसतच विरोधकांना टोला लगावला.

शांतीब्रह्म ह.भ.प. मारोती महाराज कुरेकर बाबा यांच्या ९३ व्या अभीष्टचिंतन सोहळ्यासाठी तसेच वारकरी पूजनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी आळंदी दौऱ्यावर आहे. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

माझ्या आयुष्यातील आजचा कार्यक्रम हा सर्वात आगळावेगळा आहे. वारकऱ्यांमध्ये येणे हे मी माझे भाग्य समजतो. त्याहून दुसरे पुण्य काहीच नाही. खरे म्हणजे आम्ही मुख्यमंत्री असलो किंवा सरकारमध्ये असलो तरी राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचे स्थान नक्कीच मोठे आहे. राजकीय मंडळीही आपल्यासमोर नतमस्तक होतात. कारण वारकरी एक अशी फॅक्ट्री आहे जिथे समाज तयार केला जातो. म्हणूनच आनंद दिघे नेहमी वारकरी संप्रदाय समूहात मला घेऊन यायचे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Thane : ना आरोपपत्र, ना पीडितांना भरपाई; मुंब्रा रेल्वे अपघाताचे एक वर्ष, जखमी प्रवाशांनी गमावली नोकरी, झाले कर्जबाजारी

मुंबईच्या महापौर रितू तावडेंना बॉम्बस्फोटाच्या धमकीचा ई-मेल; सुरक्षा यंत्रणा सतर्क, पोलिसांचा तपास सुरू

Mumbai : पावसाळ्यात मेट्रो सज्ज; MMRDA ची एआय-आधारित पेन्टाेग्राफ मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित

Jammu-Kashmir : ‘झोजिला’चा मार्ग मोकळा; गडकरी यांच्या हस्ते अंतिम ‘ब्रेकथ्रू’ साध्य

मुंबई एअरपोर्टवर CISF महिला जवानांच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ; CPR देत वाचवला प्रवासी महिलेचा जीव, Video